AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केकेआर फ्रेंचायझीमुळे टीम इंडियाचा हेड कोच होण्यास मदत, गौतम गंभीरने सांगितली पडद्यामागची गोष्ट

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेण्यापूर्वी गौतम गंभीर हा केकेआरचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर गौतम गंभीरच्या हाती टीम इंडियाची सूत्र आली. पण कशी आणि काय झालं ते जाणून घ्या.

केकेआर फ्रेंचायझीमुळे टीम इंडियाचा हेड कोच होण्यास मदत, गौतम गंभीरने सांगितली पडद्यामागची गोष्ट
केकेआर फ्रेंचायझीमुळे टीम इंडियाचा हेड कोच होण्यास मदत, गौतम गंभीरने सांगितली पडद्यामागची गोष्टImage Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 16, 2026 | 7:26 PM
Share

गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यापासून भारताने दोन आयसीसी चषक जिंकले. आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पण गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी गौतम गंभीरचा स्वभाव पाहता टीम इंडियाची घडी बसवता येईल का? वगैरे असे प्रश्न विचारले होते. पण गौतम गंभीरने विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. टी20 वर्ल्डकप 2024 जेतेपद मिळवल्यानंतर राहुल द्रविडने प्रशिक्षकपद सोडलं होतं. त्यानंतर गौतम गंभीरच्या हाती सूत्र आली. आता गौतम गंभीर वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत प्रशिक्षक असणार आहे. असं सर्व असताना गौतम गंभीरची टीम इंडियाचा प्रशिक्षकपदी निवड कशी झाली? आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाचं यात काय योगदान होतं? असे सर्व प्रश्नांची गौतम गंभीरने स्वत: दिली आहेत.

गौतम गंभीरने RevSportz ला दिलेल्या मुलाखतीत कोलकाता नाईट रायडर्सचा करिअरवर पडलेल्या प्रभावाचा उल्लेख केला. गौतम गंभीरने स्पष्ट सांगितलं की, आज मी जिथे आहे त्यात कोलकाता नाईट रायडर्सचं खूप मोठं योगदान आहे. गौतम गंभीरने सांगितलं की, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला लीडर बनवण्यात मुख्य भूमिका बजावली. आज जे काही नेतृत्व गुण दिसत आहेत, त्या केकेआरचं मोठं योगदान आहे. कोलकाता नाईट रायडर्ससोबत माझा कार्यकाळ यशस्वी राहिला आहे. त्यामुळेच टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाची खूर्ची मिळाल्याचं गौतम गंभीरने सांगितलं.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेत तीन वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तिन्ही विजयात गौतम गंभीर होता हे विशेष.. 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीर कर्णधार असताना जेतेपद मिळवलं. तर 2024 मध्ये केकेआरचा मेंटॉर म्हणून रूजू झाला आणि संघाने जेतेपद मिळवलं. दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर दोन आयसीसी चषक जिंकले आहे. आता वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेवर लक्ष्य असेल. दरम्यान, गौतम गंभीरच्या कारकि‍र्दीत कसोटी क्रिकेटला हवं तसं यश मिळालं नाही.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.