AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: भारतासाठी शेवटचा मार्ग, सेमी फायनलसाठी विंडीज विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार?

T20i World Cup Semi Final Scenario IND vs WI: टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सुपर 8 फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध किती फरकाने विजय मिळवावा लागणार? जाणून घ्या.

T20 World Cup 2026: भारतासाठी शेवटचा मार्ग, सेमी फायनलसाठी विंडीज विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार?
Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 27, 2026 | 11:05 AM
Share

टीम इंडियासाठी गुरुवार 26 फेब्रुवारी निर्णायक दिवस होता. गुरुवारी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज आमनेसामने होते. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्याने भारताला सेमी फायनलच्या हिशोबाने फार मोठी मदत झाली. भारताने त्यानंतर सुपर 8 मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वेवर 72 धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील पाचवा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवलं. ए ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या ग्रुपमधून एका जागेसाठी 2 भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये चुरस आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला सेमी फायनलच्या हिशोबाने एक चुकही चांगलीच महागात पडू शकते.

झिंबाब्वे विरुद्ध काय झालं?

भारताने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झिंबाब्वे विरुद्ध 256 धावांचं डोंगर उभारला. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाला इथवर पोहचवण्यात पहिल्या 6 फलंदाजांनी योगदान दिलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी झिंबाब्वेला ओव्हरमध्ये 6 झटके देत 184 धावांवर रोखलं. भारताने यासह 72 धावांनी सामना जिंकत आपलं आव्हान कायम ठेवलं.

दक्षिण आफ्रिकेमुळे भारताची चिंता मिटली

दक्षिण आफ्रिकेने विंडीजवर विजय मिळवल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या विंडीज विरूद्धच्या विजयामुळे भारताचं उपांत्य फेरीच्या हिशोबाने समीकरण सोपं झालं. त्याआधी भारतासाठी उपांत्य फेरीचं समीकरण जर तरचं आणि अवघड होतं. भारतासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने अमूक धावांनी-विकेट्सने विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या विंडीज विरुद्धच्या विजयामुळे भारताला आता उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी फक्त विजय मिळवायचा आहे.

टीम इंडियाने झिंबाब्वेला पराभूत करत 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. आता विंडीजला पराभूत केलं की टीम इंडियाच्या खात्यात 4 गुण होतील. टीम इंडिया यासह सेमी फायनलमध्ये पोहचेल. टीम इंडिया यासह ए ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरेल.

विंडीजसाठीही करो या मरो

दरम्यान टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. आता हा सामना जिंकून कोणता संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणार?याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.