AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना पार पडला. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला. तसेच तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली. या विजयानंतर कर्णधार शुबमन गिलने मनोगत व्यक्त केलं आहे.

IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही...
IND vs AFG: वनडे मालिका जिंकल्यानंतर कर्णधार गिलने व्यक्त केलं मत, 330 दिल्या असत्या तरी आम्ही...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 17, 2026 | 10:11 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दुसरा वनडे सामना भारताने खिशात घातला. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारतीय संघाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402 धावा केल्या. तसेच विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवरच गारद झाला. भारताने हा सामना 170 धावांनी जिंकली. वनडे क्रिकेटमधील भारताने अफगाणिस्तानवर मिळवलेला हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 275 धावांनी पराभूत केलं होतं. त्यांनंतर आता 170 धावांनी विजय मिळवत भारताने विक्रम रचला आहे. या विजयानंतर भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने जिंकली आहे.

शुबमन गिल म्हणाला की…

अफगाणिस्तानविरूद्धच्या या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दीड शतकी खेळी केली. शुबमन गिलने 110 चेंडूत 22 चौकार आणि 2 षटकार मारत 154 धावा केल्या. शुबमन गिल तिसऱ्या षटकात मैदानात उतरला होता आणि 43व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. यावेळी त्याला दुखापतीलाही सामोरं जावं लागलं. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. दुखापतीबाबत शुबमन गिल म्हणाला की, ‘थोडं दुखतंय, खूप पेटके येत आहेत. 40-45 षटकं फलंदाजी केली आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांत पेटके आले. सध्या खेळपट्टी खूप चांगल्या स्थितीत आहे, चेंडू नेमका मला हवा तिथेच जातोय. या मालिकेसाठी माझं एक लक्ष्य होतं की मला 40-45 षटकांपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहायचं आहे. मी ते केलं, पण मला माहित होतं की 440-450 धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मला माझे फटके मारत राहावे लागतील.’

शुबमन गिल म्हणाला की, आमच्या वाटेला प्रथम गोलंदाजी आली असती तरी आम्ही 300 च्या वरील धावा आरामात गाठल्या असत्या. शुबमन गिलने या स्थितीबाबत सांगितलं की, ‘जरी आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती तरी खेळपट्टी अशीच होती. जर 320-330 धावांचा पाठलाग करायचा असता, तर ते आमच्यासाठी एक चांगलं आव्हान ठरलं असतं. सर्व गोलंदाज सध्या खूप चांगल्या स्थितीत आहेत, ज्या प्रकारे आमचे वेगवान गोलंदाज या खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करत आहेत ते खूप समाधानकारक आहे.’

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!