AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : सूर्यासेनेचा वानखेडेत धुमाकूळ, इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाच्या 253 रन्स

India vs England Semi Final T20 Wc 2026 : टीम इंडियाला 250 पार पोहचवण्यात संजू सॅमसन याने प्रमुख भूमिका बजावली. तर इतर फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली. त्यामुळे इंग्लंडसमोर 254 धावांचं आव्हान ठेवता आलं.

IND vs ENG : सूर्यासेनेचा वानखेडेत धुमाकूळ, इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाच्या 253 रन्स
Ishan Sanju Shivam Dube and Hardik PandyaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Mar 05, 2026 | 10:24 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध धमाका केला आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये ओपनर संजू सॅमसन आणि इतर फलंदाजांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 254 धावांचं महाकाय असं आव्हान दिलं आहे. सूर्यासेनेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने या धावांसह असंख्य विक्रम मोडीत काढले आहेत. टीम इंडियाने नक्की काय काय केलं? तसेच कोणत्या फलंदाजाने किती धावांचं योगदान दिलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडियाची बॅटिंग

टॉस गमावल्यानंतर टीम इंडियाची संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामी जोडी मैदानात आली. अभिषेक या सामन्यातून कमबॅक करेल, असं वाटलं होतं. मात्र अभिषेकने पुन्हा निराशा केली. भारताच्या 20 धावा असताना अभिषेक 9 रन्सवर आऊट झाला.

संजू-इशानचा धुमाकूळ

अभिषेक आऊट झाल्यानंतर संजूने इशान किशन याच्या मदतीने धमाका केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी वादळी भागीदारी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी फक्त 45 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप केली. इशानला मोठ्या खेळीची संधी होती. मात्र इशानने फटकेबाजी करुन आपली भूमिका चोखपणे पार पाडली. इशानने 18 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.

संजूचं शतक हुकलं

इशान आऊट झाल्यानंतर संजूने शिवम दुबेसह 22 बॉलमध्ये 43 रन्सची पार्टनरशीप केली. संजूला शतकाची चांगली संधी होती. मात्र संजू आऊट झाला. संजूचं शतक अवघ्या 11 धावांनी हुकलं. संजूने 89 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत जोरदार फटकेबाजी केली.

संजू आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या चौघांनी वादळी खेळी केली. सूर्याने 11, शिवमने 43, तिलकने 21 तर हार्दिकने 27 धावांचं योगदान दिलं. तर अक्षर पटेल 2 धावांवर नाबाद परतला. टीम इंडियाने यासह 253 धावांपर्यंत मजल मारली. तर इंग्लंडसाठी आदिल रशीद आणि विल जॅक्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने 1 विकेट मिळवली.

विक्रमांची रांग, विंडीजचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

दरम्यान टीम इंडियाने या 253 धावांसह काही ऐतिहासिक असे विक्रम केले. इंडिया 2 वेळा 250 पेक्षा अधिक धावा करणारी दुसरी टीम ठरली. तसेच टीम इंडियाने एका डावात सर्वाधिक 19 षटकार लगावले. तसेच भारताने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीत विंडीजच्या सर्वोच्च 205 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. विंडीजने 2012 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 विकेट्स गमावून 205 धावा केल्या होत्या.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.