AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : हेड कोच गौतम गंभीर याचा पराभवानंतर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न! म्हणाला…

Gautam Gambhir Press Conference : गुवाहाटीतील पराभवानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याच्यावर पत्रकार परिषदेत तिखट प्रश्नांचा मारा करण्यात आला. गंभीरनेही या प्रश्नांची पद्धतशीर उत्तरं दिली.

IND vs SA : हेड कोच गौतम गंभीर याचा पराभवानंतर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न! म्हणाला...
Team India Head Coach Gautam GambhirImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 26, 2025 | 4:36 PM
Share

न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेने भारताचा भारतातच धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर 408 धावांनी  मात केली. दक्षिण आफ्रिकेने यासह भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. भारताचा हा मायदेशातील गेल्या 3 कसोटी मालिकांमधील सलग दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताची गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे गंभीरवर सडकून टीका केली जात आहे. गंभीरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका पराभवानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं. गंभीरने या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. गंभीरने या पत्रकार परिषदेत काही मुद्दे स्पष्ट केले. भारताच्या या कामगिरीसाठी हेड कोच म्हणून गंभीरला जबाबदार ठरवण्यात आलंय. मात्र गंभीरने दिलेल्या प्रतिक्रियेवरुन त्याने या पराभवाला आपण एकटे जबाबदार नसल्याचं सांगितलंय. गंभीरने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

हेड कोच गंभीर काय म्हणाला?

भारताच्या पराभवासाठी कुणी एक खेळाडू जबाबदार नाही. भारताच्या पराभवाला ड्रेसिंग रुममधील प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे”, असं गंभीरने म्हटलं. गंभीरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आलंय.  गौतम गंभीर पराभवाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतोय, असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

भारताची निराशाजनक कामगिरी

भारतीय संघाने अपवाद वगळता या मालिकेतील दोन्ही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या फलंदाजांनी तर घोर निराशा केली. कोलकातातील पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा अडीच दिवसांतच पराभव झाला. भारताने फिरकीसाठी पोषक खेळपट्टी तयार केली होती. मात्र भारतीय संघावरच आपला डाव उलटला. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी मिळालेल्या 124 धावांचाही पाठलागही करता आला नव्हता. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी जिकंला होता.

तर दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव हा 489 च्या प्रत्युत्तरात 201 धावांवर आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 260 रन्सवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताला 549 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला 140 रन्सवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे हा सामना 408 धावांनी जिकंला. भारताचा हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.

टीम इंडियाची गंभीर स्थिती

दरम्यान टीम इंडियाचा हा मायदेशातील गेल्या 3 कसोटी मालिकांमधील दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताने दक्षिण आफ्रिकेआधी वेस्ट इंडिजला 2-0 ने पराभूत केलं होतं. त्याआधी 2024 साली भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. न्यूझीलंडने भारताला 3-0 ने व्हाईटवॉश केलं होतं.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक