AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : नाणेफेक जिंकल्यावर कोणता निर्णय ठरेल फायद्याचा? जाणून घ्या डरबनमधील खेळपट्टीचा अहवाल

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिलाच सामना 8 नोव्हेंबर रोजी डरबनमध्ये होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. ही खेळपट्टी कशी आहे? तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात

IND vs SA : नाणेफेक जिंकल्यावर कोणता निर्णय ठरेल फायद्याचा? जाणून घ्या डरबनमधील खेळपट्टीचा अहवाल
| Updated on: Nov 08, 2024 | 3:36 PM
Share

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. चार सामन्यांची टी20 मालिका भारतीय संघ खेळणार आहे. या सामन्यातील पहिला सामना 8 नोव्हेंबरला डरबनमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेतून यश दयाल, विजयकुमार विशाक आणि रमणदीप सिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यातून दोन्ही संघांचा विजयाचा मानस असणार यात शंका नाही. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेऊनच कौल घेतला जाईल. डरबनची खेळपट्टी ही मोठी धावसंख्या होईल अशीच आहे. पहिल्या डावातील सरासरी धावा या 153 आहेत. तर दुसऱ्या डावातील धावांची सरासरी ही 135 आहे. या मैदानावर आतापर्यंत 18 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 वेळा विजय मिळवला आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 8 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला आहे. डरबनमध्ये आधीच पाऊस पडला असून खेळपट्टी ओलसर असणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजाना सुरुवातीला फायदा होईल. गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असूनही तग धरून फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या होऊ शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

तसं पाहिलं तर डरबनच्या खेळपट्टीचा अंदाज बांधणं खूपच कठीण आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाने 191 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. दुसरीकडे, या मैदानावर भारताने फक्त एकच टी20 सामना खेळला आहे. 17 वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा 37 धावांनी पराभव केलेला. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली होती. तसेच आरपी सिंगने 4 षटकात 13 धावा देत 4 गडी बाद केले होते.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 15 सान्यात विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. उभय देशात शेवटचा टी20 सामना वर्ल्डकपमध्ये 29 जून 2024 रोजी खेळला गेला. अतितटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. दुसरीकडे, भारताने दक्षिण अफ्रिकेत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 10 सामने खेळले आहेत. यात सहा सामन्यात भारताने, तर तीन सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आहे. तर डरबनमध्ये झालेला एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला होता.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.