AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार! कसं ते समजून घ्या

न्यूझीलंडने कसोटी मालिकेत 3-0 ने मात दिल्यानंतर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित चुकलं आहे. भारताला टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठायची म्हंटलं तर 4-0 ने ऑस्ट्रेलियाला मात द्यावी लागणार आहे. पण मालिका गमावल्यानंतर भारत अंतिम फेरी गाठेल का? तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर उत्तर जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार! कसं ते समजून घ्या
| Updated on: Nov 06, 2024 | 6:34 PM
Share

न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्न धुसर झालं आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला काहीही करून ही मालिका 4-0 किंवा 5-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा हे गणित सर्व जर तर वर अवलंबून राहणार आहे. न्यूझीलंडकडून दारूण पराभव झाल्यानंतर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे टॉप दोन मध्ये राहण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करणं सध्याचा फॉर्म पाहता कठीण आहे. पण मागच्या दोन मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला होता. त्यामुळे काहीही होऊ शकतं.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तर..

  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-3 ने गमावली तर न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंकेच्या कामगिरीवर लक्ष असेल. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध फक्त एकच सामना जिंकायला हवा. दक्षिण अफ्रिकेने 4 कसोटी सामन्यात 2 सामने गमावले पाहीजेत. तसेच श्रीलंकेने 4 पैकी 2 सामने गमावले पाहीजेत.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2, 1-3 किंवा 1-0 ने गमावली तर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकावी. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात द्यावी. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करावं. तसेच दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 1-1 ने ड्रॉ व्हावी.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिाक 1-4, 0-2, 0-3 ने गमावली तर इंग्लंडने न्यूझीलंडला 2-0 किंवा 3-0 ने पराभूत करावं. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत करावं, ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करावं आणि श्रीलंका-दक्षिण अफ्रिका यांच्यातील मालिका 1-1 ने ड्रॉ व्हावी.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 4-0 किंवा 5-0 ने गमावली तर सर्व गणित संपुष्टात येईल. म्हणजेच भारताचे अंतिम फेरीचे सर्व रस्ते बंद होतील.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली तर..

  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका  4-0 किंवा 5-0 ने मालिका जिंकली तर थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल.
  • भारताने ऑस्टेलियाला 3-1, 3-0, 4-1 ने मात दिली तर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील किमान एका सामना ड्रॉ करणं गरजेचं आहे.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर इंग्लंडने कसोटी मालिकेत न्यूझीलंडला किमान एका सामन्यात पराभूत करणं गरजेचं आहे.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकी 3-2 ने जिंकली तर इंग्लंडने न्यूझीलंडला किमान एका सामन्यात पराभूत करावं. तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एक सामना ड्रॉ करावा.
  • भारताने कसोटी मालिका 2-1 किंवा 1-0 ने जिंकल्यास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत फक्त एकाच सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळावा, अशी प्रार्थना करावी लागेल. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना ड्रॉ करावा.
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली तर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध फक्त एक विजय मिळवावा. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना ड्रॉ करावा.
  • भारत ऑस्ट्रेलिया मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडला फक्त एका सामन्यात विजय मिळावा. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकावी.
  • भारत ऑस्ट्रेलिया मालिकेत दोन्ही संघांनी एकही सामना जिंकला नाही तर इंग्लंडने न्यूझीलंडला मालिकेत पराभूत करणं आवश्यक आहे. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत करावं. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करावं. तर दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत सुटावा.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना