AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: फक्त किंग कोहलीच नव्हे, हे खेळाडूही ठरले भारताच्या शानदार विजयाचे हिरो

Team Indias Victory Hero : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली व्यतिरिक्त इतरही अनेक खेळाडूंनी संघाच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली.

IND vs SA: फक्त किंग कोहलीच नव्हे, हे खेळाडूही ठरले भारताच्या शानदार विजयाचे हिरो
IND vs SA 1st ODI
| Updated on: Nov 30, 2025 | 11:11 PM
Share

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 349 धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना आफ्रिकन संघाने सर्वबाद 332 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. मात्र कोहली व्यतिरिक्त इतरही अनेक खेळाडूंनी संघाच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली. यामुळे भारताला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. भारतीय संघाच्या विजयाचे हिरो कोण होते ते जाणून घेऊयात.

विराट कोहलीने शानदार शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात थोडी खराब झाली. यशस्वी जयस्वाल केवळ 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने सावध सुरुवात केली आणि नंतर आक्रमक फटकेबाजी करत 102 चेंडूत शतक झळकावले. शतकानंतरही त्याने फटकेबाजी सुरू ठेवली. कोहलीने या सामन्यात 120 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह 135 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने 349 धावा केल्या.

हर्षित राणा आणि कुलदीप यादवची शानदार गोलंदाजी

हर्षित राणाने भारताला गोलंदाजीत शानदार सुरुवात करून दिली. त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये रायन रिकल्टन आणि क्विंटन डी कॉकला बाद करत सलग दोन धक्के दिले. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर गेला होता. त्यानंतर कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्याने 10 षटकांत चार विकेट घेतल्या. त्याने मॅथ्यू ब्रेज्टके, टोनी डी जॉर्गी, मार्को जॅन्सेन आणि प्रेनेलन सुब्रायन यांना बाद केले. हर्षित राणा आणि कुलदीर यादवही भारताच्या विजयाचे हिरो ठरले.

भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 349 धावांचा डोंगर उभा केला होता. विराटच्या शतकाशिवाय रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनीही संघासाठी अर्धशतके झळकावली. रोहितने 57 आणि राहुलने 60 धावांची खेळी केली. त्यामुळे भारत मोठी धावसंख्या उभारू शकला. एकंदरीत विराट कोहली, कुलदीप यादव, हर्षित राणा, रोहित शर्मा आणि कर्णधार केएल राहुल हे खेळाडू भारताच्या विजयाचे हिरो ठरले. या खेळाडूंमुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...