AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाला 8 दिवसांचा ब्रेक, कधी सुरु होईल जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. आता चौथ्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेत आतापर्यंत इंग्लंडने 2-1 आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे.

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाला 8 दिवसांचा ब्रेक, कधी सुरु होईल जाणून घ्या
चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाला 8 दिवसांचा ब्रेक, कधी सुरु होईल जाणून घ्या Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 15, 2025 | 6:33 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना इंग्लंडने 5 गडी राखून, दुसरा सामना भारताने 336 धावांनी, तर तिसरा सामना इंग्लंडने अवघ्या 22 धावांनी जिंकला. आता मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला चौथा सामना काहीही करून जिंकावा लागेल. तसं झालं नाही तर किमान हा सामना ड्रॉ करून पाचव्या सामन्यात विजयाची अपेक्षा करावी लागेल. कारण हा सामना गमावला तर भारताच्या हातून मालिका जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरू होईल. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान आठ दिवसांचे अंतर आहे. या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन्ही संघ 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर मैदानावर उतरतील.

भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी साडे तीन वाजता सुरु होईल. तीन वाजचा नाणेफेकीचा कौल होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना थेट पाहता येईल. तुम्ही थेट सामना मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकता. या कसोटीचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवर केले जाईल. पहिले सत्र दोन तासांचे असेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता लंच ब्रेक होईल. 40 मिनिटांच्या ब्रेकनंतर संध्याकाळी 6.10 मिनिटांना सामना सुरु होईल. दुसरे सत्र देखील दोन तासांचे असेल. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी टी ब्रेक होईल. हा ब्रेक 20 मिनिटांचा असेल. त्यानंतर रात्री 8.30 ते 10 वाजेपर्यंत हा खेळ चालेल.

टीम इंडिया कसोटी सामन्यात बदल करण्याची शक्यता आहे. कारण मागच्या तीन सामन्यात करूण नायरची खेळी काही खास राहिली नाही. त्याला वारंवार संधी देऊनही तो आपला फॉर्म काही दाखवू शकला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या ऐवजी संघात साई सुदर्शनला संधी मिळू शकते. तर जसप्रीत बुमराहला आराम दिला जाऊ शकतो. तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.