AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त, रोहितसह विराटही चिंतेत!

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. (IPL 2021 Mi vs RCB Hardik Pandya Injured Scare)

IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त, रोहितसह विराटही चिंतेत!
हार्दिक पांड्याला दुखापत
| Updated on: Apr 10, 2021 | 12:14 PM
Share

चेन्नई :  आयपीएल 2021 च्या (IPL2021) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनफिट दिसला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना तो नीटपणे थ्रो देखील करु शकत नव्हता. हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. पहिल्या सामन्यात फिल्डिंग करताना तो अंडर आर्म थ्रो करताना दिसला. त्याच्यामुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला एकदा जीवनदानही मिळाले. सामन्यादरम्यान असे दोन प्रसंग आले की ज्यावेळी हार्दिककडून थ्रो ची अपेक्षा असताना त्याला थ्रो करणं जमलं नाही. साहजिक यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. (IPL 2021 Mi vs RCB Hardik Pandya Injured Scare)

दोन प्रसंग, हार्दिक पांड्या फिट नसल्याचं समोर

हार्दिक पांड्या अनफिट आहे हे सातव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर ठळकपणे जाणवलं. क्रुणाल पंड्याच्या बोलिंगवर विराट कोहलीने खेळपट्टीच्या बाजूला बॉल टोलवला आणि धाव घेण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला इशारा केला परंतु मॅक्सवेलने नकार दिला. याचदरम्यान विराट कोहली क्रीजच्या फार पुढे आला होता. आपण रनआऊट होणार हे कोहलीला किंबहुना लक्षात आलं होतं. बॉल हार्दिक पांड्याकडे गेला होता. मात्र त्याला व्यवस्थित थ्रो टाकता न आल्याने कर्णधार कोहली आरामात क्रीजवर पोहोचला. हार्दिकने जर उत्तम थ्रो मारला असता तर कोहली आऊट झाला असता. कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा दिसला असता.

आरसीबीच्या डावाच्या आठव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे पुन्हा दिसून आले. राहुल चहरच्या चेंडूवर कोहलीने स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅन दरम्यान शॉट मारला. चेंडू हार्दिककडे गेला आणि तो चेंडू वेळेवर फेकू शकला नाही. त्याने पहिल्यांदा रोहितला बॉल फेकला आणि रोहितने मग इशान किशनकडे बॉल फेकला.

बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये अपयशी

मुंबई विरुद्ध बंगळुरु या सलामीच्या सामन्यात हार्दिकची बॅट तळपणार, अशी मुंबईच्या चाहत्यांना आशा होती. मात्र बंगळुरुच्या बोलर्सने मुंबईकर फलंदाजांना त्यातही हार्दिकला मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. हार्दिकने 10 बॉलमध्ये 13 धावा काढल्या. मात्र संधी असताना मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं.

(IPL 2021 Mi vs RCB Hardik Pandya Injured Scare)

हे ही वाचा :

IPL 2021 : विराट कोहलीला हरवलेला खेळाडू सापडला, 8 वर्षानंतर कोहिनूर हिरा मैदानात उतरला!

IPL 2021 : मॅक्सवेलचा गगनचुंबी षटकार स्टेडियमच्या बाहेर, विराट कोहलीही हैरान, दिली ‘अशी’ रिअॅक्शन! पाहा व्हिडीओ

IPL 2021 : RCB च्या 7 फूट उंचीच्या बोलर्सने मुंबईकर क्रुणाल पांड्याची बॅट तोडली, फॅन्स म्हणाले, ‘बचके रहेना रे…!’

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.