AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?

Rajasthan Royals vs Mumbai Indians Toss Delyed : गुवाहाटातील बारसपारा क्रिकेट स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात पाऊस झालाय. पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे.

RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?
Rajasthan Royals vs Mumbai Indians RainImage Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 07, 2026 | 8:36 PM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 6 एप्रिलला झालेल्या सामन्यात 3.5 ओव्हरचा खेळ झाला. केकेआरने 22 बॉलमध्ये 2 विकेट्स गमावून 25 धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे सव्वा 3 तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतरही चाहत्यांना सामना सुरु होईल अशी आशा होती. मात्र अखेर खेळपट्टीची परिस्थिती पाहून पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या सहमतीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सलग दुसरा सामनाही पावसामुळे रद्द होतो की काय? अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

स्पर्धेतील 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. चाहत्यांचं सामन्याआधी टॉस कोण जिंकतो? याकडे लक्ष होतं. मात्र पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होतो. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे30 मिनिटं वाया गेली आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना पावसाच्या विश्रांतीची वाट पाहावी लागणार आहे.

ग्राउंड स्टाफकडून जोरदार प्रयत्न

बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु असलेल्या पावसामुळे मैदानात पाणी जमा झालं आहे. त्यामुळे हे पाणी लवकरात लवकर हटवण्याचं आव्हान ग्राउंड स्टाफसमोर आहे. ग्राउंड स्टाफकडून युद्ध पातळीवर मैदान कोरडं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पावसाची संततधार सुरु असल्याने ग्राउंड स्टाफच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे पाऊस थांबावा अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

गुवाहाटीत पावसाची बॅटिंग

क्रिकेट चाहत्यांचा संताप

पावसाच्या व्यत्ययामुळे क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नको तिथे सामने ठेवल्यावर आणखी काय होणार? असा संतप्त सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. कधी आणि कुठे पाऊस होणार? त्या शहरातील हवामान कसं असणार? हे समजतं. हवामान खात्याकडून वेळोवेळी माहिती देण्यात येते. मात्र त्यानंतरही ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे सामन्याचं आयोजन का केलं जातं? असा संतप्त सवाल क्रिकेट चाहत्यांकडून या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Follow Us
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या.
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने....
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?.
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य.
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.