AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची सुरूवात निराशाजनक झाली आहे. खरं तर या संघावर खूपच दडपण असल्याचं दिसत आहे. महागडे खेळाडू असूनही तशी कामगिरी नसल्याने क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यात ऋषभ पंत ओपनिंगला आल्याने काय घडलं? ते सर्व जाणून घेऊयात

IPL 2026: ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
IPL 2026: ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनावर प्रश्नचिन्हImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2026 | 7:35 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचे सामने संपले असून दुसऱ्या टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांकडून सुमार फलंदाजीचं दर्शन घडलं. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यात कर्णधार ऋषभ पंत सलामीला उतरला होता. पण 9 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. धाव घेताना चुकला आणि धावचीत होत तंबूत परतला. त्याचा स्ट्राईक रेटा 77.78 चा होता. असं असताना ऋषभ पंतला ओपनिंगला पाठवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यानेही लखनौ सुपर जायंट्सच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? असा खोचक प्रश्नच त्याने विचारला आहे. पहिल्या तीन क्रमांकावर खेळताना ऋषभ पंतवर दबावात येत असल्याचं त्याने सांगितलं. खेळाचा आनंद लुटण्याऐवजी दबावात खेळत आहे.

केविन पीटरसन काय म्हणाला?

केविन पीटरसनने जिओ हॉटस्टारसोबत चर्चा करताना सांगितलं की, ‘जेव्हा तुम्ही लखनौ संघाच्या फलंदाजीची ताकद आणि खोली पाहता, तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की ऋषभ पंत खरोखरच सलामीवीर आहे का? मला वाटते की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी त्याला फलंदाजीच्या क्रमात थोडे वर पाठवण्यात आले आहे.’ पीटरसन पुढे म्हणाली की, ‘गेल्या वर्षी त्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आता तो अचानक वरच्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असं म्हणतोय. मला वाटते की त्याने फक्त मैदानात उतरून आपल्या खेळाचा आनंद घ्यावा. वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी स्वतःवर दबाव आणू नये. त्याने त्याच्या स्थानाचा आनंद घ्यावा. मला वाटते की डावाची सुरुवात करून पंत स्वतःवर दबाव टाकत आहे.’

दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना गमावल्यानंतर ऋषभ पंतला सलामीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा ऋषभ पंतने सांगितलं की, ‘ मला वाटतं हा 50-50 निर्णय आहे, पण बघूया. पण तुम्ही मला नक्कीच टॉप ऑर्डरमध्ये पाहाल.’ त्यामुळे ऋषभ पंत पुढच्या सामन्यात कितव्या क्रमांकावर उतरणार हे आता सांगणं कठीण आहे. पण पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनाची पोलखोल झाली आहे. एकही फलंदाज 40 पुढे आणि चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करू शकला नाही. कमी धावसंख्येमुळे लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांवर मात्र दबाव वाढला. आता पुढच्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल