AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इशान किशनने पुन्हा ठोठावलं टीम इंडियाचं दार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खणखणीत उत्तर

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत झारखंडचा कर्णधार इशान किशन चमकला. इशान किशनने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी करत टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे.

इशान किशनने पुन्हा ठोठावलं टीम इंडियाचं दार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खणखणीत उत्तर
इशान किशनने पुन्हा ठोठावलं टीम इंडियाचं दार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खणखणीत उत्तरImage Credit source: PTI
| Updated on: Oct 15, 2025 | 5:06 PM
Share

इशान किशन दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यानंतर त्याच्या नशिबाचे तारेच फिरले. नोव्हेंबर 2023 पासून भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तेव्हापासून इशान किशन टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. . मात्र अजूनही त्याला संधी मिळालेली नाही. आता त्याची भविष्यातील क्रिकेट कारकीर्द आता देशांतर्गत क्रिकेटवर अवलंबून आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तरच त्याचा टीम इंडियात विचार केला जाऊ शकतो. रणजी स्पर्धा सुरु असून झारखंड विरुद्ध तामिळनाडू यांच्यात सामना सुरु आहे. कोयंबतूरच्या श्री रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड अँड सायंस मैदानात हा सामना होत आहे. या सामन्यात इशान किशनने जबरदस्त खेळी केली. तसेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अजीत आगरकर यांची अटही पूर्ण केली आहे. त्यामुळे इशान आता टीम इंडियाच्या दारावर उभा असून त्याने पुन्हा एकदा दार ठोठावलं आहे.

आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यात त्याची निवड होईल असं वाटलं होतं. पण त्याला डावलण्यात आलं. इतकंच काय वेस्ट इंडिज दौऱ्यातही संधी मिळाली नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड झाली, पण इशान किशनच्या नावाचा विचारही केला गेला नाही. दरम्यान, वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर अजित आगरकर यांना इशान किशनच्या निवडीबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘इंडिया ए संघात निवड केली तेव्हा इशान किशन फिट नव्हता. त्यामुळे जगदीशन संघाचा भाग होता. आता इशानला पुनरागमनासाठी आणखी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ‘

अजित आगरकर यांच्या वक्तव्यातून स्पष्ट आहे की, इशान किशनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करण्याशिवाय पर्याय नाही. इशान किशनने ही बाब लक्षात घेऊन रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. तामिळनाडूविरुद्ध 134 चेंडूत शतक ठोकलं. त्यात 12 चौकार आणि 2 षटकार मारले. इशान किशन जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा संघाची स्थिती 3 बाज 79 धावा अशी होती. त्यानंतर त्याने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करून डाव सावरला.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश