AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Final 2022: मध्य प्रदेशने मुंबईवर विजय मिळवताच महान कोच चंद्रकांत पंडित यांचे डोळे पाणावले, पहा VIDEO

चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) हे देशांतर्गत क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. काल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशच्या संघाने बलाढ्य मुंबईला पराभूत (Mumbai vs Madhya pradesh) करुन रणजी विजेतेपद मिळवलं.

Ranji Final 2022: मध्य प्रदेशने मुंबईवर विजय मिळवताच महान कोच चंद्रकांत पंडित यांचे डोळे पाणावले, पहा VIDEO
Chandrakant panditImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 27, 2022 | 12:46 PM
Share

मुंबई: चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit) हे देशांतर्गत क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. काल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशच्या संघाने बलाढ्य मुंबईला पराभूत (Mumbai vs Madhya pradesh) करुन रणजी विजेतेपद मिळवलं. या जेतेपदासह चंद्रकांत पंडित यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मध्य प्रदेशचं हे पहिलं-वहिलं रणजी विजेतेपद (Ranji Title) आहे. त्यांनी मुंबईचं 42 व रणजी विजेतेपद मिळवण्याच स्वप्न मोडलं. पाचव्या अखेरच्या दिवशी मध्य प्रदेशने 6 विकेट राखून मुंबईवर विजय मिळवला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही रणजी फायनल झाली. रजत पाटीदारने विजयावर शिक्कामोर्तब करताच मैदानातील कॅमेरे कोच पंडीत यांच्यादिशेने फिरले. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशच्या या विजयाने भावनिक झाल्याचं दिसलं. ते मैदानावर आले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मैदानात आल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी चंद्रकांत पंडित यांनी आकाशाकडे बघितलं. कोच म्हणून चंद्रकांत पंडित यांचं हे सहाव रणजी विजेतेपद आहे.

विदर्भाचे कोच होते

भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या चंद्रकांत पंडीत यांनी क्रिकेटपटू म्हणून मध्य प्रदेशच प्रतिनिधीत्व केलं आहे. याआधी चंद्रकांत पंडित विदर्भाचे कोच होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संघाने 2017/18 साली रणजी विजेतेपद मिळवलं आहे.

भावनिक का झालो, त्याचं कारण सांगितलं?

मैदानावर व्ही. रमन यांना मुलाखत देताना चंद्रकांत पंडित यांनी, विजयी धाव घेतल्यानंतर आपण का भावूक झालो, त्याचं कारण उलगडलं. 1998/99 साली मध्य प्रदेशचा संघ रणजी फायनलमध्ये पोहोचला, त्यावेळी चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे कॅप्टन होते. त्यावेळी याच चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक संघाविरुद्ध अखेरच्या दिवशी त्यांच्या संघाला 247 धावांचं लक्ष्य गाठता आलं नव्हतं.

ज्या मैदानात अपयशी ठरलो, तिथेच….

कॅप्टन म्हणून ज्या मैदानावर अपयश आलं होतं. त्याच मैदानात कोच म्हणून यश मिळणं ही मोठी बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. अखेरच्या दिवशी दुसऱ्याडावात मुंबईला 269 धावा करता आल्या. पहिल्याडावातील आघाडीमुळे मध्य प्रदेशला विजयासाठी 108 धावांचे लक्ष्य मिळाले. ते त्यांनी आरामात पार केलं.

Follow Us
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.