AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs SL : जो रूटने शतक ठोकताच विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पण…

इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात 427 धावांची खेळी केली. पण इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ 150 धावांच्या आतच तंबूत परतला. या सामन्यात जो रूटने शतकी खेळी केली. पण त्याची थेट तुलना विराट कोहलीशी केली गेली. पण झालं असं की..

ENG vs SL : जो रूटने शतक ठोकताच विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पण...
| Updated on: Aug 30, 2024 | 8:58 PM
Share

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचं पारडं दुसऱ्या दिवशीच जड झालं आहे. कारण श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढावू शकते. इंग्लंडने पहिल्या डावात 10 गडी गमवून 427 धावा केल्या. तर पहिल्या डावात श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक संघ 150 धावांच्या आताच तंबूत परतला आहे. असं सर्व इंग्लंडच्या बाजूने चित्र असताना जो रूट आणि विराट कोहली यांची चर्चा रंगली आहे. खरं तर हा विषय इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने समोर आणत डिवचलं आहे. त्याने जो रुटच्या शतकाचा संदर्भ देत विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मायकल वॉनने जो रूट आणि विराट कोहली यांची तुलना करणारी आकडेवारी पोस्ट केली आहे. जो रूट विराट कोहलीच्या पुढे असल्याचं या पोस्टच्या माध्यमातून त्याने दाखवलं आहे. जो रूटने कसोटीत 33, तर विराट कोहलीने 29 शतकं झळकावली आहेत.

मायकल वॉन विराट कोहलीला ट्रोल करताना एक गोष्ट विसरला की, विराट कोहली जो रूटपेक्षा 72 डाव कमी खेळला आहे. दुसरीकडे विदेशात कसोटी शतकांबाबत बोलायचं तर रुटने SENAI देशात फक्त 6 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीचा हा आकडा 11 आहे. विराट कोहलीने मागच्या 4 वर्षात फक्त 2 शतकं झळकावली आहेत. तर जो रूटने 16 शतकं ठोकली आहेत. दरम्यान विराट कोहली पुढच्या वर्षात बरंच कसोटी क्रिकेट खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला शतकी खेळी करण्याची संधी आहे. जर या दोन सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली तर जो रूटशी स्पर्धा तीव्र होईल.

पुढच्या महिन्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेवर लक्ष लागून असणार आहे. कारण टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला पराभूत केल्याने बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे बांगलादेशला हलक्यात घेणं महागडा पडू शकतं. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.