AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: बांगलादेशने वेस्ट इंडिजचा घरातच धुव्वा उडवला, कॅप्टन पूरन आता टीम इंडियाच्या बाबतीतही चुकतोय

इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचं पाणी पाजून टीम इंडिया पोर्ट ऑफ स्पेन मध्ये दाखल झाली आहे. शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये (India vs West Indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला (Odi series) सुरुवात होत आहे.

IND vs WI: बांगलादेशने वेस्ट इंडिजचा घरातच धुव्वा उडवला, कॅप्टन पूरन आता टीम इंडियाच्या बाबतीतही चुकतोय
nicholas pooran
| Updated on: Jul 20, 2022 | 2:16 PM
Share

मुंबई: इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचं पाणी पाजून टीम इंडिया पोर्ट ऑफ स्पेन मध्ये दाखल झाली आहे. शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये (India vs West Indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला (Odi series) सुरुवात होत आहे. या वनडे सीरीज मध्ये भारताचे अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. मात्र तरीही टीम इंडिया मजबूत आहे. पण वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनला (Nicholas Pooran) असं वाटत नाही. निकोलस पूरन टीम इंडियाला कमी लेखण्याची चूक करतोय. पूरनने भारताच्या वनडे स्क्वाडबद्दल जे मत व्यक्त केलं, ते वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला हसू येईल.

टीम इंडियाला पराभूत करणं अजून सोपं

टीम इंडियातील अनेक मोठे खेळाडू वनडे सीरीज मध्ये खेळत नाहीयत. त्यामुळे भारतीय संघाला हरवणं अजून सोपं होईल, असं निकोलस पूरनच मत आहे. त्रिनिदाद मध्ये होणाऱ्या वनडे मॅच आधी निकोलस पूरन दबावाचा खेळ खेळतोय. “अनेक भारतीय खेळाडू वनडे सीरीज मध्ये नाहीयत. त्यामुळे आमचं काम अजून सोपं होईल” असं पूरन म्हणाला. असं जरी पूरनने म्हटलं असलं, तरी टीम इंडियाची क्षमता देखील मान्य केली. “भारताकडे लाखो खेळाडू आहेत, जे संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात” असं पूरन म्हणाला. “टीम इंडियाकडे चेंडू आणि बॅटने मॅच जिंकवून देणारे अनेक खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजचा संघ त्यांना कडवी टक्कर देईल. वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड क्रिकेटला संदेश देणार आहे” असं पूरनने सांगितलं.

भारताचे हे खेळाडू मालिकेत नाही दिसणार

टीम इंडियाचे सीनियर खेळाडू वनडे सीरीज मध्ये खेळत नाहीयत. यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि रोहित शर्माचा समावेश आहे. पंत आणि रोहित शर्मा पाच सामन्यांच्या टी 20 सीरीज मध्ये खेळताना दिसतील. विराट-बुमराह यांना संपूर्ण सीरीजसाठी विश्रांती दिलीय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन वनडे संघाचा कर्णधार आहे. सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा आणि इशान किशन सारखे युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवताना दिसतील. गोलंदाजीत युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह सारखे टॅलेंटेड खेळाडू उपलब्ध आहेत. दुसऱ्याबाजूला वेस्ट इंडिजने मायदेशातच बांगलादेशविरुद्ध वनडे सीरीज गमावली आहे. बांगलादेशने वेस्ट इंडिजला 3-0 अशी धुळ चारली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.