AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“देवा तूच मला सांग, आता…”, मुंबई संघातून डावलल्यानंतर पृथ्वी शॉ अखेर व्यक्त होत म्हणाला…

पृथ्वी शॉ हे नाव गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. क्रिकेटच्या पटलावर लहानपणापासूनच पृथ्वी शॉचा नावलौकिक पाहायला मिळाला आहे. पण त्याच्या कारकि‍र्दीला ग्रहण लागलं आहे. आता मुंबई संघातूनही वगळण्यात आलं आहे. असं असताना त्याने इंस्टास्टोरीतून भावना व्यक्त केल्या आहेत.

देवा तूच मला सांग, आता..., मुंबई संघातून डावलल्यानंतर पृथ्वी शॉ अखेर व्यक्त होत म्हणाला...
| Updated on: Dec 17, 2024 | 7:10 PM
Share

पृथ्वी शॉकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात होतं. लहानपणापासून त्याने क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला आहे. पण आता त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला एक प्रकारे ग्रहण लागलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण त्याला टीम इंडियातून डावलण्यात आलं. त्यानंतर आयपीएल मेगा लिलावात स्वत:ची किंमत 75 लाख रुपये ठेवूनही कोणी घेतलं नाही.त्यानंतर सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेतही सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नाही. मुंबईने ही स्पर्धा जिंकली मात्र अंतिम फेरीत त्याने फक्त 10 धावा केल्या. त्यात आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता पृथ्वी शॉचं क्रिकेट करिअर संपल्यातच जमा आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. असं असताना बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ व्यक्त झाला आहे. इंस्टास्टोरीवर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट दिली आहे. तसेच साईबाबांना प्रार्थना केली आहे.

“मला सांग देवा, मला अजून काय पहायचे आहे..जर 65 डाव, 126 च्या स्ट्राईक रेटने 55.7 च्या सरासरीने 3399 धावा केल्या तर मी पुरेसा चांगला नाही. पण मी तुझ्यावर विश्वास ठेवीन आणि आशा आहे की लोकांचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. कारण मी नक्की परत येईन..ओम साई राम”, अशी इंस्टास्टोरी पृथ्वी शॉने ठेवली आहे. पृथ्वी शॉला आयपीएल लिलावात कोणत्याच फ्रेंचायझीने घेण्यात रूची दाखवली नाही. सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघात पृथ्वी शॉ देखील होता. शॉने नऊ सामन्यांमध्ये 197धावा करत या स्पर्धेत आपली चमक दाखवली. पण यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता.

Prithvi_Insta_Story

दुसरीकडे, मुंबई संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरने सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धा जिंकल्यानंतर पृथ्वी शॉबाबत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘मला वैयक्तिकरित्या वाटते की तो गॉड गिफ्टेड खेळाडू आहे. एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे जितकी प्रतिभा आहे, ती कोणाकडेही नाही. त्याला त्याच्या कामाची नीतिमत्ता सुधारण्याची गरज आहे.’, असं श्रेयस अय्यर म्हणाला होता.

Follow Us
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही.
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता...
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत.....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत......
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या.