AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या कसोटी सामन्यातून रजत पाटिदारचा पत्ता कट! बीसीसीआयने आखली अशी रणनिती

भारत इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 3-1 ने जिंकली आहे. त्यामुळे पाचवा सामना औपचारिक असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एकंदरीत असं चित्र पाहता पाचव्या कसोटी फॉर्म गमावलेल्या रजत पाटिदारचा पत्ता कट होऊ शकतो.

पाचव्या कसोटी सामन्यातून रजत पाटिदारचा पत्ता कट! बीसीसीआयने आखली अशी रणनिती
सुमार कामगिरीचा रजत पाटिदारला बसला फटका! आता चूक सुधारण्यासाठी उचललं असं पाऊल
| Updated on: Feb 28, 2024 | 5:18 PM
Share

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना 7 मार्च रोजी धर्मशाळा येथे आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ शेवट गोड करण्याचा प्रयत्नात आहे. पाचवा सामना जिंकला तर गुणतालिकेत अव्वल स्थान गाठणं सोपं होणार आहे. त्यामुळे मालिका जिंकली तरी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघात काही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे. निवडकर्ते 2 मार्चपर्यंत प्लेइंग इलेव्हनबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. केएल राहुल संघात परतणार की, रजत पाटिदारला संघात स्थान मिळणार यावर खलबतं सुरु झाली आहेत. तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करताना स्पष्ट केलं होतं की, “केएल राहुल फिट होईपर्यंत रजत पाटिदारला संघात स्थान दिले.” पण सध्या रजत पाटिदारला सूर गवसताना दिसत नाही. दुसरीकडे, केएल राहुल फिट की अनफिट यावरही प्रश्नचिन्ह आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलला उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये सतत दुखापत जाणवत असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला गेला आहे. दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मागच्या तीन कसोटी सामन्यांपासून दूर राहिला होता. टाईम्स इंडियाच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांना पाटिदारला संघातून वगळायचं आहे. जेणेकरून तो रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशकडून मैदानात उतरेल. हा सामना 2 मार्चला होणार आहे. त्यामुळे केएल राहुल फीट झाला तर रजत पाटिदारला डच्चू मिळेल.

दुसरीकडे, रजत पाटिदारच्या जागी देवदत्त पडिक्कल यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण रजने मागच्या सहा डावात हवी तशी कामगिरी केलेली नाही. मागच्या सहा डावात रजत पाटिदाराची 32 ही सर्वोत्तम खेळी आहे. पाटिदार दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत त्याला या ना त्या कारणाने वगळण्याची शक्यता आहे. शेवटचा कसोटी सामना झाला की आयपीएलची रणधुमाळी असेल. त्यानंतर लगेचच टी20 वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे कसोटीसाठी ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल