AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : विकेट पडता पडे ना…! रवींद्र जडेजा संतापला आणि थेट अंशुल कंबोजवर काढला राग, झालं असं की..

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड आता सैल होताना दिसत आहे. पहिल्या डावात भारताने केलेल्या धावांचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग केला आहे. तसेच आता त्यात अतिरिक्त धावांची भर पडणार आहे. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.

Video : विकेट पडता पडे ना...! रवींद्र जडेजा संतापला आणि थेट अंशुल कंबोजवर काढला राग, झालं असं की..
रवींद्र जडेजा संतापला आणि थेट अंशुल कंबोजवर काढला राग, झालं असं की..Image Credit source: PTI
| Updated on: Jul 25, 2025 | 6:38 PM
Share

भारत इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसावर इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. इंग्लंडने खऱ्या अर्थाने भारताने बेजबॉलचा दणका दिला असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या डावात भारताने 358 धावांची खेळी केली. पण या धावांचा इंग्लंडने यशस्वीरित्या पाठलाग केला. ते देखील फक्त 4 विकेट गमवून.. त्यामुळे आता इंग्लंड भारतासमोर पहिल्या डावातच मोठी आघाडी घेण्याची शक्यता आहे. ही आघाडी मोडून काढणं भारताला कठीण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असताना भारतीय संघ इंग्लंडच्या विकेट काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. विकेट घेण्यासाठी गोलंदाज सर्वस्वी पणाला लावत आहे. पण इंग्लंडचे फलंदाज सर्व हल्ला परतवून लावत आहेत. असं असतान तिसऱ्या दिवशी अंशुल कंबोजकडून मोठी चूक घडली. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. त्याच्या या चुकीमुळे भारताला जो रूटची विकेट मिळाली नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाने त्याच्यावर मैदानातच राग काढला.

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जो रूटची विकेट पडण्याची शक्यता बळावली होती. रूटने सिराजने टाकलेला चेंडू गली एरियात मारला आणि तिथे रवींद्र जडेजा उभा होता. जडेजाने पटाईतपणे हा चेंडू पकडला आणि नॉन स्ट्राईकला फेकला. पण चेंडू काही विकेटला लागला नाही. पण हे सर्व घडत असताना मिड ऑनवर असलेला अंशुल कंबोज धावत नॉन स्ट्राईकला येऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. तसं पाहीलं तर जो रूट हा क्रिजपासून खूप लांब होता. त्यामुळे रवींद्र जडेजाचा पारा चढला. त्याने कंबोजला काही तरी ऐकवल. त्याच्या हावभावावरून रागवलेला दिसला.

जो रूटने भारताविरुद्ध मैदानात जम बसवला आहे. आणखी एक शतकाकडे कूच केली आहे. दरम्यान, जो रूटने अर्धशतकी खेळीसह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने कसोटी सर्वाधिक धावा करणाऱ्या राहुल द्रविड आणि जॅक कॅलिसचा विक्रम मोडीत काढला आहे. द्रविडने 13288 आणि 13289 धावा केल्या होत्या. आता जो रूट यांच्या पुढे निघून गेला आहे. आता रिकी पॉन्टिंग 13378 आणि सचिन तेंडुलकर 15921 धावांसह त्याच्या पुढे आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.