AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI : मुंबई इंडिअन्सचा पराभव पण तिलक वर्मा याने केली थेट धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री

बई इंडिअन्स संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र युवा खेळाडू तिलक वर्माने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्यासोबतच त्याने धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री केलीये.

RCB vs MI : मुंबई इंडिअन्सचा पराभव पण तिलक वर्मा याने केली थेट धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री
| Updated on: Apr 03, 2023 | 12:37 AM
Share

मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडिअन्स संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबईचा 8 विकेट्स आणि 22 बॉल राखून पराभव केला आहे. या सामन्याध्ये मुंबईचे सर्व बॅट्समन फेल गेलेले दिसले. मात्र एका युवा खेळाडूने सर्वांची मनं जिंकली तो खेळाडू म्हणजे तिलक वर्मा.

एकट्याच्या जोरावर त्याने मुंबईला 170 चा टप्पा ओलांडूवन दिला होता. 46 चेंडूंमध्ये तिलक वर्मा याने 84 धावांची दमदार खेळी केली. या खेळीमुळे त्याने एक स्पेशल क्लबमध्ये आपली जागा मिळवली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या पाऊलावर पाऊल ठेवलं आहे.

आरसीबी संघाविरूद्ध पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक करणाऱ्या खेळाडूंमध्या त्याने जागा मिळवली आहे. डेव्हिड मिलरच्या नावावर आरसीबीविरुद्ध सर्वाधिक डावांचा विक्रम आहे. आयपीएल 2013 मध्ये त्याने 38 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी नितीश राणा असून त्याने नाबाद 85 धावा केल्या होत्या. तिसऱ्या स्थानी धोनीने आयपीएल 2019 मध्ये आरसीबीविरुद्ध 48 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या. तर आजच्या कडक खेळीमध्ये तिलकनेही 84 धावांची नाबाद खेळी करत तोसुद्धा तिसऱ्या स्थानी आला आहे.

आजच्या सामन्यामध्ये मुंबईने 48 धावांच्या आतच आपले 4 मोहरे गमावले होते. यामध्ये रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव हे बाद झाले होते. मात्र त्यानंतर तिलकने मुंबईची कमान आपल्या हातात घेत नेहल वढेरासोबत पाचव्या विकेटसाठी 50 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. 14व्या षटकात वढेरा बाद झाल्यावर त्याने अर्शद खान सोबत भागीदारी केली, शेवटच्या दोन ओव्हरमध्ये त्याने 38 धावा काढल्या. या धावांच्या जोरावर मुंबईने 171 धावा केल्या.

दरम्यान, आरसीबीकडून विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस यांनी 148 धावांची सलामी दिली. मुंबईला सामन्यामध्ये येऊ देण्याची एकही संधी दिली नाही. फॅफ 73 धावा करून बाद झाला. विराट कोहली  82 धावा करून नाबाद राहिला. त्यानंतर आलेला कार्तिक तिसऱ्या बॉलवर बाद झाला, मॅक्सवेलने दोन षटकार मारत सामना जिंकून दिला.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...