AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात

टी20 क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. सलग मालिका जिंकण्याचा विक्रम केल्यानंतर आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही विजयी घोडदौड सुरू आहे. भारतीय फलंदाजी सक्षम असल्याचं दिसून आलं आहे. असं असताना श्रीलंकेा फलंदाज भानुका राजपक्षेने टीम इंडियाच्या बॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात
खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यातImage Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 10, 2026 | 4:53 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अमेरिकेला पराभूत करून विजयाचा नारळ फोडला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजीची घसरगुंडी पाहायला मिळाली. पण एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला आणि विजयाची पाया भक्कम केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदारांपैकी एक मानली जात आहे. कारण गेल्या दोन वर्षात टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांची निर्धास्त खेळीमुळे प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येत आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फटकेबाजीत तरबेज आहे. समोर गोलंदाज कोणीही असला तरी मोठे फटके मारण्यात मागे पुढे पाहात नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी वेगळी आहे. असं असताना श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे याने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. राजपक्षेच्या मते भारतीय फलंदाजांच्या बॅटमुळे त्यांची फलंदाजी अधिक सक्षम झाली आहे.

भानुका राजपक्षे याने एका मुलाखतीत भारतीय फलंदाजाच्या बॅटवर संशय व्यक्त केला आहे. भानुका राजपक्षेने सांगितलं की, भारतीय फलंदाज एका खास पद्धतीच्या बॅट वापरत आहे. या बॅट इतर संघाच्या खेळाडूंना मिळत नाहीत. या बॅट इतर बॅटच्या तुलनेत अधिक बळकट आहेत. या बॅट इतक्या प्रगत आहेत की त्या बॅटवर रबराचा थर लावला असावा. ‘भारतीय फलंदाजांकडे ज्या बॅट आहेत, त्या आमच्याकडे मिळणाऱ्या बेस्ट बॅटपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत. असं वाटतं की त्यावर रबराचा एक थर चढवला असावा. मला समजत नाही की हे कसं काय शक्य आहे. या बॅट दुसरं कोणीही खरेदी करू शकत नाही. ही बाब सर्व खेळाडूंना माहिती आहे.’ दरम्यान, आयसीसी नियमानुसार, बॅटवर कोणत्याही पद्धतीचा थर लावू शकत नाही.

भारताने टी20 वर्ल्डकप 2024 पासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. फलंदाजीला आल्यापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची रणनिती आहे. मागच्या दोन वर्षात भारताने अनेकदा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. इतकंच काय तर 200हून अधिक धावा करण्याचा यादीतही आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....