AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात

टी20 क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. सलग मालिका जिंकण्याचा विक्रम केल्यानंतर आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही विजयी घोडदौड सुरू आहे. भारतीय फलंदाजी सक्षम असल्याचं दिसून आलं आहे. असं असताना श्रीलंकेा फलंदाज भानुका राजपक्षेने टीम इंडियाच्या बॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात
खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यातImage Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 10, 2026 | 4:53 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अमेरिकेला पराभूत करून विजयाचा नारळ फोडला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजीची घसरगुंडी पाहायला मिळाली. पण एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला आणि विजयाची पाया भक्कम केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदारांपैकी एक मानली जात आहे. कारण गेल्या दोन वर्षात टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांची निर्धास्त खेळीमुळे प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येत आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फटकेबाजीत तरबेज आहे. समोर गोलंदाज कोणीही असला तरी मोठे फटके मारण्यात मागे पुढे पाहात नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी वेगळी आहे. असं असताना श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे याने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. राजपक्षेच्या मते भारतीय फलंदाजांच्या बॅटमुळे त्यांची फलंदाजी अधिक सक्षम झाली आहे.

भानुका राजपक्षे याने एका मुलाखतीत भारतीय फलंदाजाच्या बॅटवर संशय व्यक्त केला आहे. भानुका राजपक्षेने सांगितलं की, भारतीय फलंदाज एका खास पद्धतीच्या बॅट वापरत आहे. या बॅट इतर संघाच्या खेळाडूंना मिळत नाहीत. या बॅट इतर बॅटच्या तुलनेत अधिक बळकट आहेत. या बॅट इतक्या प्रगत आहेत की त्या बॅटवर रबराचा थर लावला असावा. ‘भारतीय फलंदाजांकडे ज्या बॅट आहेत, त्या आमच्याकडे मिळणाऱ्या बेस्ट बॅटपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत. असं वाटतं की त्यावर रबराचा एक थर चढवला असावा. मला समजत नाही की हे कसं काय शक्य आहे. या बॅट दुसरं कोणीही खरेदी करू शकत नाही. ही बाब सर्व खेळाडूंना माहिती आहे.’ दरम्यान, आयसीसी नियमानुसार, बॅटवर कोणत्याही पद्धतीचा थर लावू शकत नाही.

भारताने टी20 वर्ल्डकप 2024 पासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. फलंदाजीला आल्यापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची रणनिती आहे. मागच्या दोन वर्षात भारताने अनेकदा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. इतकंच काय तर 200हून अधिक धावा करण्याचा यादीतही आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड