AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात

टी20 क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. सलग मालिका जिंकण्याचा विक्रम केल्यानंतर आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही विजयी घोडदौड सुरू आहे. भारतीय फलंदाजी सक्षम असल्याचं दिसून आलं आहे. असं असताना श्रीलंकेा फलंदाज भानुका राजपक्षेने टीम इंडियाच्या बॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात
खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यातImage Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 10, 2026 | 4:53 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अमेरिकेला पराभूत करून विजयाचा नारळ फोडला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजीची घसरगुंडी पाहायला मिळाली. पण एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला आणि विजयाची पाया भक्कम केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदारांपैकी एक मानली जात आहे. कारण गेल्या दोन वर्षात टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांची निर्धास्त खेळीमुळे प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येत आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फटकेबाजीत तरबेज आहे. समोर गोलंदाज कोणीही असला तरी मोठे फटके मारण्यात मागे पुढे पाहात नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी वेगळी आहे. असं असताना श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे याने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. राजपक्षेच्या मते भारतीय फलंदाजांच्या बॅटमुळे त्यांची फलंदाजी अधिक सक्षम झाली आहे.

भानुका राजपक्षे याने एका मुलाखतीत भारतीय फलंदाजाच्या बॅटवर संशय व्यक्त केला आहे. भानुका राजपक्षेने सांगितलं की, भारतीय फलंदाज एका खास पद्धतीच्या बॅट वापरत आहे. या बॅट इतर संघाच्या खेळाडूंना मिळत नाहीत. या बॅट इतर बॅटच्या तुलनेत अधिक बळकट आहेत. या बॅट इतक्या प्रगत आहेत की त्या बॅटवर रबराचा थर लावला असावा. ‘भारतीय फलंदाजांकडे ज्या बॅट आहेत, त्या आमच्याकडे मिळणाऱ्या बेस्ट बॅटपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत. असं वाटतं की त्यावर रबराचा एक थर चढवला असावा. मला समजत नाही की हे कसं काय शक्य आहे. या बॅट दुसरं कोणीही खरेदी करू शकत नाही. ही बाब सर्व खेळाडूंना माहिती आहे.’ दरम्यान, आयसीसी नियमानुसार, बॅटवर कोणत्याही पद्धतीचा थर लावू शकत नाही.

भारताने टी20 वर्ल्डकप 2024 पासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. फलंदाजीला आल्यापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची रणनिती आहे. मागच्या दोन वर्षात भारताने अनेकदा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. इतकंच काय तर 200हून अधिक धावा करण्याचा यादीतही आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन