AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup संघातून हार्दिक पंड्याला डच्चू मिळणार? पुढील चार दिवसात फैसला

असे म्हटले जात होते की, अंतिम संघ देण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर होती परंतु ती फक्त त्याच संघांसाठी होती जे 17 ऑक्टोबरपासून पात्रता फेरीत खेळतील.

T20 World Cup संघातून हार्दिक पंड्याला डच्चू मिळणार? पुढील चार दिवसात फैसला
हार्दीक पंड्या
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 11, 2021 | 7:37 PM
Share

मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या 17 तारखेपासून सुरू होणाऱ्या टी – 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. मात्र, बीसीसीआयच्या निवड समितीला हवे असल्यास ते संघात बदल करू शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे चार दिवस आहेत. आयसीसीकडे विश्वचषकासाठी संघ पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघातील काही खेळाडू अलीकडेच IPL-2021 मध्ये खेळून मोकळे झाले आहेत, तर काही अजूनही खेळत आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नावाची मोठी चर्चा आहे कारण त्याने गोलंदाजी न करणे हा चिंतेचा विषय आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्ते पंड्याबाबाबत अद्याप विचारात आहेत आणि तो गोलंदाज म्हणून संघात राहील की नाही याचा विचार करत आहेत. तसेच संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज जोडण्याचा विचार केला जात आहे. (T20 World Cup : BCCI Selectors will take call on Hardik Pandya on 15th october)

वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पंड्याबाबत पुढील काही दिवसात निर्णय होऊ शकतो. निवडकर्त्यांनी फक्त तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे, कारण पंड्या फिट असेल तर तो त्याच्या कोट्यातून चार षटके गोलंदाजी करू शकेल असा विश्वास होता. त्याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही, तसेच तो फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही.

संघात बदल केले जाऊ शकतात

असे म्हटले जात होते की, अंतिम संघ देण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर होती परंतु ती फक्त त्याच संघांसाठी होती जे 17 ऑक्टोबरपासून पात्रता फेरीत खेळतील. टीओआयने आयसीसीच्या एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “संघ त्यांचा सपोर्ट पीरियड सुरू होण्याच्या सात दिवस आधीपर्यंत संघात बदल करू शकतात. भारताचा सपोर्ट पीरियड सुपर -12 टप्प्यापासून सुरू होत आहे, म्हणजेच 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्यामुळे बीसीसीआयकडे संघ बदलण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे.

निवड समितीला काय वाटतं

वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्त्यांना पंड्याबद्दल पूर्णपणे खात्री बाळगायची आहे. संपूर्ण विश्वचषकात गोलंदाजी करण्यासाठी पंड्या पूर्णपणे फिट आहे याविषयी पूर्ण स्पष्टता हवी आहे. पंड्याचा मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पंड्याने या संपूर्ण आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांची स्टँड बाय म्हणून निवड झाली आहे. गरज असल्यास, यापैकी एकाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. सूत्राने सांगितले की, “पंड्याने गोलंदाजी केली नाही तर त्याला वगळले जाईल असे ठरवण्यात आले नाही, पण अष्टपैलू म्हणून त्याच्याकडे कमी वेळ आहे. ठाकूर आणि दीपक संघात आल्यास, निवडकर्ते हर्षल पटेलला यूएईमध्ये राहण्यास सांगू शकतात.”

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(T20 World Cup : BCCI Selectors will take call on Hardik Pandya on 15th october)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली