AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी शास्त्रीनंतर येणाऱ्या प्रशिक्षकासाठी ‘हे’ असेल मोठं काम, कर्णधार बदलल्यानंतर प्रशिक्षकाचं काम वाढणार

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली टी 20 संघाचं कर्णधारपद सोडणार आहे. त्याने नुकतीच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. यानंतर आता संघात आणखी काय बदल होणार हेही पाहावं लागेल.

रवी शास्त्रीनंतर येणाऱ्या प्रशिक्षकासाठी 'हे' असेल मोठं काम, कर्णधार बदलल्यानंतर प्रशिक्षकाचं काम वाढणार
विराट आणि रवी शास्त्री
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 2:10 PM
Share

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये गुरुवारी (16 सप्टेंबर) एक मोठा बदल होणार असल्याची घोषणा झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) टी 20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती एका सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आता या बातमीनंतर अजून एका मोठ्या बातमीची येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती म्हणजे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचाही कार्यकाळ संपत आला असून तेही लवकरच पदावरुन पायउतार होणार आहेत. अशावेळी त्यांच्या जागी नव्याने येणाऱ्या प्रशिक्षकासाठी एक मोठं काम म्हणजे विराट आणि रोहित यांच्यात सामंजस्याचं नातं निर्माण करणं असणार आहे.

विराटने कर्णधारपद सोडताच रोहितला ही जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच विराट आणि रोहितमध्ये वाद असल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात. अर्थात यात तत्थ असल्याची बातमी कधीच आलेली नाही. पण दोघेही अत्यंत वरीष्ट खेळाडू असल्याने दोघांचा खेळ आणि निर्णय यांचा विचार करत संघाची रणनीती आखणं हे येणाऱ्या प्रशिक्षकसाठी मोठं काम असणार आहे हे नक्की. विराटने अचानकपणे हा मोठा निर्णय घेतला असून यावरुन अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी भारताचे मुख्य निवडकर्ता संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी एक मोठा खुलासा करत कोहली आणि बीसीसीआय़ (BCCI) यांच्यात तणावपूर्ण वातावरण असल्याचा खुलासा केला आहे. पाटील हे मुख्य निवडकर्ता असतानाच कोहलीला पहिल्यांदा कर्णधारपद मिळालं होतं.

रोहित शर्माकडे टी 20 चं कर्णधारपद पक्क?

विराटनंतर संघात कर्णधारपदासाठी सर्वाधिक चर्चा ही रोहित शर्माच्याच नावाची आहे. टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

रोहित शर्मा भारताकडून 43 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये एका द्विशतकासह 8 शतकं आणि 14 अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. तर रोहित शर्माने 227 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29 शतकं आणि 43 अर्धशतकं झळकावली आहेत. 3 द्विशतकं ठोकणारा रोहित हा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

हे ही वाचा :

IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा ‘हा’ महारथी खेळणार कोणत्या संघातून?

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर ‘या’ दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना संधी, संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळणार?

विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा

(To maintain good relation in rohit and virat after captaincy change is Big work for new coach)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.