AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं

भारताने आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत एक सामना गमावला आहे. त्यामुळे टीम इंडियावर टीका होत आहे. असं असताना भारतीय संघावर वारंवार सामने गमवण्याची वेळ का आली आहे? याबाबत फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी स्पष्ट सांगितलं.

भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं
भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलंImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 06, 2026 | 10:46 PM
Share

भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 मालिका दौरा होता. या मालिकेत भारताला क्लिन स्विप मिळाला. दोन सामन्यांची टी20 मालिका भारताने 0-2 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही सुरूवात काही खास झाली नाही. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची सद्यस्थिती पाहता या मालिकेतही काही खरं नाही असंच वाटत आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जिंकणाऱ्या संघाची स्थिती इतकी वाईट कशी झाली? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. याचं उत्तर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी दिलं आहे.

काय म्हणाले सितांशु कोटक?

तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी सितांशु कोटक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, जेव्हा संघात बदल होतो तेव्हा अशा गोष्टी होऊ शकतात. सितांशु कोटक म्हणाले की, ‘गेल्या दोन वर्षांत आम्ही एकही मालिका हरलेलो नाही. आम्ही टी20 विश्वचषक, आशिया कप जिंकला. दोन-तीन सामने हरल्यानंतर अनेक जण म्हणू लागले की संघ हरत आहे. हा खेळाचा नियम आहे. कधीकधी, जेव्हा बदल होतो. कर्णधार बदलतो, हार्दिक संघात नसतो, आणि तुम्ही तीन-चार तरुण खेळाडूंना संधी देता, तेव्हा अशा गोष्टी घडू शकतात. तरीही, असे व्हायला नको, पण खेळात असे घडते. पण भारतीय संघ प्रयत्न करत राहील.’

हार्दिक पांड्याची उणीव

टीम इंडियाला अष्टपैलू हार्दिक पांड्याची उणीव भासत असल्याचं फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी मान्य केलं. कोटक म्हणाले की, नितीश कुमार रेड्डीला संधी दिली होती. पण तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे सूर्यांश शेडगेवर जबाबदारी टाकली गेली. खेळाडू सामने खेळत असू की नसू 15 खेळाडूंच्या चमूत राहून बरंच काही शिकतो. सितांशु कोटक यांनी पुढे सांगितलं की, टीम इंडिया फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करेल. टीम इंडिया पुढचा वर्ल्डकप जिंकू इच्छिते आणि यासाठी चांगलं करणं आवश्यक आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा