AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं

भारताने आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत एक सामना गमावला आहे. त्यामुळे टीम इंडियावर टीका होत आहे. असं असताना भारतीय संघावर वारंवार सामने गमवण्याची वेळ का आली आहे? याबाबत फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी स्पष्ट सांगितलं.

भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं
भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलंImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 06, 2026 | 10:46 PM
Share

भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 मालिका दौरा होता. या मालिकेत भारताला क्लिन स्विप मिळाला. दोन सामन्यांची टी20 मालिका भारताने 0-2 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही सुरूवात काही खास झाली नाही. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची सद्यस्थिती पाहता या मालिकेतही काही खरं नाही असंच वाटत आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जिंकणाऱ्या संघाची स्थिती इतकी वाईट कशी झाली? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. याचं उत्तर टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी दिलं आहे.

काय म्हणाले सितांशु कोटक?

तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी सितांशु कोटक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, जेव्हा संघात बदल होतो तेव्हा अशा गोष्टी होऊ शकतात. सितांशु कोटक म्हणाले की, ‘गेल्या दोन वर्षांत आम्ही एकही मालिका हरलेलो नाही. आम्ही टी20 विश्वचषक, आशिया कप जिंकला. दोन-तीन सामने हरल्यानंतर अनेक जण म्हणू लागले की संघ हरत आहे. हा खेळाचा नियम आहे. कधीकधी, जेव्हा बदल होतो. कर्णधार बदलतो, हार्दिक संघात नसतो, आणि तुम्ही तीन-चार तरुण खेळाडूंना संधी देता, तेव्हा अशा गोष्टी घडू शकतात. तरीही, असे व्हायला नको, पण खेळात असे घडते. पण भारतीय संघ प्रयत्न करत राहील.’

हार्दिक पांड्याची उणीव

टीम इंडियाला अष्टपैलू हार्दिक पांड्याची उणीव भासत असल्याचं फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी मान्य केलं. कोटक म्हणाले की, नितीश कुमार रेड्डीला संधी दिली होती. पण तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे सूर्यांश शेडगेवर जबाबदारी टाकली गेली. खेळाडू सामने खेळत असू की नसू 15 खेळाडूंच्या चमूत राहून बरंच काही शिकतो. सितांशु कोटक यांनी पुढे सांगितलं की, टीम इंडिया फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करेल. टीम इंडिया पुढचा वर्ल्डकप जिंकू इच्छिते आणि यासाठी चांगलं करणं आवश्यक आहे.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय