AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: सलग पराभवानंतरही श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन सरावातून गायब! नेमकं काय घडलं?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना महत्त्वाचा आहे. कारण मालिकेत राहायचं तर हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. पण असं असूनही सराव शिबिरात श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन नव्हते.

IND vs ENG: सलग पराभवानंतरही श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन सरावातून गायब! नेमकं काय घडलं?
IND vs ENG: सलग पराभवानंतरही श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन सरावातून गायब! नेमकं काय घडलं?Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 06, 2026 | 9:11 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना नॉटिंघमच्या ट्रेंटब्रिज येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. असं असताना तिसरा टी20 सामना जिंकावाच लागणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन सरावासाठी उतरले नाहीत. नॉटिंघममध्ये उपस्थित असलेल्या भारतीय पत्रकारांच्या रिपोर्टनुसार, दोन्ही खेळाडू सरावासाठी मैदानात उपस्थित नव्हते. या सामन्यापूर्वी दोघांनी आराम करण्याचा निर्णय घेतला असावा असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.

संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर कुठे गेले?

भारतीय संघाची बस ट्रेंट ब्रिजमध्ये पोहोचली तेव्हा खेळाडू एक एक करून बसमधून उतरले. पण या बसमध्ये श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन हे खेळाडू नव्हते. दोघं या बसमध्ये नसल्याने दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली. प्रश्न असा आहे की, हे दोन्ही खेळाडू तिसऱ्या टी20 सामन्यात खेळणार नाही का? कारण मागच्या सामन्यात संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली होती. तर श्रेयस अय्यरला मागच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो फिट नाही असं बोललं जात आहे. त्यामुळेच सरावासाठी आला नाही का? असाही प्रश्न आहे. श्रेयस अय्यर तिसऱ्या टी20 सामन्याला मुकला तर टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. कारण मागच्या दोन सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली आहे.

टीम इंडिया अडचणीत

आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. पहिला सामना रद्द झाला आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्यासाठी आणि विजयासाठी सलग तीन सामने जिंकावेच लागतील. अन्यथा कठीण होईल. मागच्या सामन्यात 190 धावा करूनही भारतीय संघाला त्याचा बचाव करता आला नाही. त्यामुळे ट्रेंट ब्रिजवर सामन्यात काय होते? याकडे लक्ष लागून आहे.

इंग्लंडचा संघ सज्ज

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. त्यांनी 24 तासाआधीच संघ जाहीर केला आहे. मागच्या सामन्यातील संघच मैदानात उतरणार आहे.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन – फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रुक, जेकब बेथेल, टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, जोश टंग आणि आदिल रशीद.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय