AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?

भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर असून पहिल्याच सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या स्पर्धेत अभिषेक शर्माने झंझावाती खेळी केली. त्याने अर्धशतक झळकावलं आणि बॅटही वर केली. पण आता त्याच्या अर्धशतकातून एक धाव कापण्यात आली आहे.

IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?
IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 27, 2026 | 8:35 PM
Share

आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाला सहज हरवू हा आत्मविश्वास टीम इंडियाच्या अंगाशी आला. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने भारताला 38 धावांनी पराभूत करून दणका दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच पराभूत करत इतिहास रचला. तसेच भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पूर्ण 20 षटकंही खेळता आली नाही, हा दुहेरी धक्का बसला तो वेगळा.. असं असताना या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. त्याने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण आता त्याच्या खात्यातून एक धाव कमी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या खात्यातील अर्धशतक हुकलं आहे. अभिषेक शर्माने 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि 20 चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. पण आता अर्धशतक एका धावेने हुकलं असंच म्हणावं लागेल.

अभिषेक शर्माचं अर्धशतक हुकण्याचं कारण की..

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याची ही त्याची पाचवी वेळ म्हणून कौतुक करण्यात आलं. कारण या आधी कोणत्याही फलंदाजाने तीनपेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे वेगवान अर्धशतकांचा मान त्याला मिळाला होता. पण आतातून एक अर्धशतक वजा झालं आहे. सामना संपल्यानंतर धावफलकावर अभिषेकची धावसंख्या 50 ऐवजी 49 दाखवण्यात आली. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. चुकून झालं असावं असं अनेकांना वाटलं. पण त्याच्या धावसंख्येतून खरंच एक धाव वजा केल्याचं कळताच अनेकांना धक्का बसला.

अभिषेक शर्माच्या धावसंख्येत एक धाव चुकून जोडली गेली होती. ही एक धाव डावाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आली होती. पण ही धाव अभिषेकच्या बॅटने नाही तर लेग बाय होती. सामन्यानंतर ही चूक दुरूस्त करण्यात आली. त्यामुळे अभिषेक शर्मा अर्धशतकापासून वंचित राहिला. खरं तर सामना सुरू असताना अभिषेक शर्माने अर्धशतक साजरं केलं म्हणून बॅटही वर केली होती. पण आता त्याच्या खात्यात अर्धशतक नसेल हे स्पष्ट झालं आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला