AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : गौतम गंभीर हाय-हाय ! भर मैदानात घोषणा ऐकताच विराट कोहलीने जे केलं… VIDEO पहाच

Gautam Gambhir : टीम इंडिया मैदानात असतानाच गौतम गंभीर विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यावेळी विराट कोहलीदेखील तिथेच उपस्थित होता. त्या घोषणा ऐकताच कोहलीने..

Virat Kohli : गौतम गंभीर हाय-हाय ! भर मैदानात घोषणा ऐकताच विराट कोहलीने जे केलं... VIDEO पहाच
गौतम गंभीर- विराट कोहलीImage Credit source: PTI
| Updated on: Jan 20, 2026 | 9:11 AM
Share

Gautam Gambhir-Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका संपली असून तीन सामन्यांची ही सीरिज न्युझीलंडने 1-2 अशी जिंकली. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा झाली, अनेकांना पराभवाचा धक्का बसाला. मात, याच मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यानंतर जे घडले ते हैराण करणारं होतं. इंदूरमध्ये एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना खेळवण्यात आला, जिथे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. तिथे उपस्थित लोकांनी थेट टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरविरुद्ध घोषणा द्यायला सुरूवात केली. गौतम गंभीर हाय-हाय , असे अनेक नारे या स्टेडियममधील चाहत्यांना लावले, त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मैदानावर उपस्थित होते, तेव्हाच ही घोषणाबाजी झाली. गौतम गंभीर विरुद्धचे नारे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

गंभीरविरोधात नारेबाजी

इंदूरचे होळकर स्टेडियम “गौतम गंभीर, हाय-हाय !” अशा घोषणांनी दुमदुमत होतं! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाविरुद्ध हे सर्व घडत असताना विराट कोहली टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसह मैदानावर उपस्थित होता. तिथे जे काही चाललं होतं ते त्यालापहावलं नाही. अखेर त्यानेच पुढाकार घेऊन जे केलं त्याने सर्वानांच आश्चर्य वाटलं.

मैदानात गंभीर हाय-हाय चा आवाजा ऐकू येत होता, मात्र विराट कोहलीला ते काही रुचलं नाही. त्याने गर्दीकडे पाहिलं आणि त्यांना शांत होण्याचा, गप्प बसण्याचा इशारा केला. त्याची रिॲक्शन पाहून असं वाटत होतं की तो वैतागला होता. गंभीरविरोधात त्या घोषणा ऐकून विराटने लोकांना आवाज बंद करण्यास सांगितलं, शांत राहण्यास सांगितलं.  गंभीरविरुद्ध झालेली घोषणाबाजी आणि त्यावर विराटची प्रतिक्रिया यांचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by CricEnt (@cricentverse)

इंदूरमध्ये टीम इंडियाने गमावली मालिका

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा निर्णायक सामना रविवारी इंदूर येथे खेळवण्यात आला. न्यूझीलंडने यापूर्वी कधीही मालिकेच्या निर्णायक सामन्यात भारताला हरवले नव्हते आणि त्यांनी भारतात कधीही एकदिवसीय मालिका जिंकली नव्हती. त्यामुळे टीम इंडिया नक्की विजयी होईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, विश्वास होता. मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली, ज्यामुळे लोकं प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली.

Follow Us
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल