AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : पाचव्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान येणार संपुष्टात ? कसं आहे गुणतालिकेतील गणित जाणून घ्या

आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी सुमार राहिली आहे. पहिल्या चार पैकी चार सामन्यात पराभवाची नोंद केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी पाचवा सामना जिंकावा लागेल.

IPL 2023 : पाचव्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान येणार संपुष्टात ? कसं आहे गुणतालिकेतील गणित जाणून घ्या
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबी विरुद्धचा सामना करो या मरोचा! पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान येणार संपुष्टात?
| Updated on: Apr 12, 2023 | 7:30 PM
Share

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळणार आहे. आता चौथ्या फेरीचा टप्पा सुरु आहे. दिल्ली, लखनऊ, राजस्थान आणि चेन्नईने प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. लखनऊ, राजस्थान आणि चेन्नईची स्पर्धेतील स्थिती चांगली आहे. दिल्लीनं आतापर्यंत खेळलेले चारही सामने गमावले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेत राहण्यासाठी पुढचे दहापैकी आठ सामने जिंकावं लागणार आहे. आता दिल्लीचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी आहे. त्यामुळे या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान कठीण होईल. कारण दिल्लीचा संघ सोडला तर इतर संघानी आतापर्यंत 6 ते 4 गुणांची कमाई केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं तीन पैकी दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे चौथा सामन्यात जिंकून आव्हान कायम ठेवण्याचा मानस असेल. दुसरीकडे दिल्लीसाठी हा सामना करो या मरोसारखाच असणार आहे. सलग पाच पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान कायम ठेवणं कठीण होईल. त्याचबरोबर धावगतीही उणे स्थितीत असल्याने आणखी फटका बसेल. त्यामुळे हा सामना दिल्लीला काहीही करून जिंकावाच लागेल.

दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनऊने 50 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात गुजरातने 6 गडी आणि 11 चेंडू राखून पराभवाची धूळ चारली. तिसऱ्या सामन्यात राजस्थानने 57 धावांनी, तर चौथ्या सामन्यात मुंबईने 6 गडी राखून पराभूत केलं.

बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबईला 8 गडी आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकात्याने 81 धावांनी, तर लखनऊने 1 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे चौथा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 27 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापीकी बंगळुरुने 16 आणि दिल्लीने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.