AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना संधी, हार्दिकचा समावेश, कॅप्टन कोण?

Hockey Asia Cup 2025 : हॉकी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. जाणून घ्या भारताचं वेळापत्रक.

Team India : टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना संधी,  हार्दिकचा समावेश, कॅप्टन कोण?
India FlagImage Credit source: PTI
| Updated on: Aug 20, 2025 | 9:17 PM
Share

बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे. तर शुबमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. त्यानंतर आता 20 ऑगस्ट रोजी आगामी आशिया कप स्पर्धेसाठी हॉकी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघात 18 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

हॉकी आशिया कप स्पर्धेला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 7 सप्टेंबरला या स्पर्धेची सांगता होईल. या स्पर्धेतील सामने हे राजगीर हॉकी स्टेडियममध्ये होणार आहेत. हॉकी टीम इंडियाचा या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतासह या ग्रुपमध्ये चीन, जपान आणि कझाकिस्तानच्या हॉकी संघाचा समावेश आहे.

भारताचा पहिला सामना केव्हा?

भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 29 ऑगस्टला खेळणार आहे. भारतासमोर या सामन्यात चीनचं आव्हान असणार आहे. दुसरा सामना हा 31 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध जपान यांच्यात लढत होणार आहे. तर भारतीय संघाचा साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 1 सप्टेंबरला कझाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत सिंह या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे.

भारतीय संघात या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून या स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

कृष्णा बी पाठक आणि सूरज करकेरा या दोघांना गोलकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे. हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंह, सुमित, संजय आणि जुगराज सिंह यांच्यावर डिफेन्सची जबाबदारी असणार आहे.

भारतीय संघ आशिया कपसाठी सज्ज

मिडफिल्डर म्हणून मनप्रीत सिंह, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंह, राजकुमार पाल आणि हार्दिक सिंह यांना संधी दिली गेली आहे. तसेच फॉरवर्ड अटॅकची जबाबदारी अभिषेक, मनदीप सिंह, शिलानंद लाकडा आणि दिलप्रीत सिंह यांच्यावर आहे.

हॉकी आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत सिंह (कॅप्टन), कृष्ण बी पाठक (गोलकीपर), सूरज करकेरा (गोलकीपर), सुमित, जरमनप्रीत सिंह, संजय, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह, राजिंदर सिंह, राज कुमार पाल, हार्दिक सिंह, मनप्रीत सिंह, विवेक सागर प्रसाद, मनदीप सिंह, शिलानंद लाकडा, अभिषेक, सुखजीत सिंह आणि दिलप्रीत सिंह.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.