AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाला क्रिकेटचे धडे देणारा पारशी समाज क्रिकेट जगातातूनच आऊट का झाला; ही आहेत कारणं त्याची…

मुंबईः एक काळ होता जेव्हा भारतात (Indian), क्रिकेटचा (Cricket) संघ (Team) अस्तित्वात आला, त्यावेळी त्या संघात चार खेळाडू हे पारशी समाजाचे असायचे आणि उरलेले सगळे इतर भारतीय असत. मात्र आता काळ बदलून गेला, आज भारतीय संघात या पारसी समाजातील एकही खेळाडू खेळत नाही, ज्यांनी क्रिकेट भारतात आणला आज त्यांच्याशिवाय आता चार दशकं भारतीय संघ क्रिकेट […]

देशाला क्रिकेटचे धडे देणारा पारशी समाज क्रिकेट जगातातूनच आऊट का  झाला; ही आहेत कारणं त्याची...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 09, 2022 | 9:29 AM
Share

मुंबईः एक काळ होता जेव्हा भारतात (Indian), क्रिकेटचा (Cricket) संघ (Team) अस्तित्वात आला, त्यावेळी त्या संघात चार खेळाडू हे पारशी समाजाचे असायचे आणि उरलेले सगळे इतर भारतीय असत. मात्र आता काळ बदलून गेला, आज भारतीय संघात या पारसी समाजातील एकही खेळाडू खेळत नाही, ज्यांनी क्रिकेट भारतात आणला आज त्यांच्याशिवाय आता चार दशकं भारतीय संघ क्रिकेट खेळत आहे. इंग्रजांनी समुद्रातील लाटांसोबत आपल्याबरोबर एक गोष्ट आणली ती म्हणजे क्रिकेट.

हा खेळ इंग्रजांसोबतच भारतात आला, आणि त्यांच्यासोबत बराच काळ राहिला. हे दूर देशातून आलेले खलाशी आणि त्यांचे साथीदार भारतातील उष्णतेला कंटाळून ते समुद्राच्या किनारी ते क्रिकेट खेळत. त्यावेळी भारतीयांना हा खेळ अजब वाटायचा. भारतीयांनी तो खेळ पाहिला पण तो फक्त तुकड्या तुकड्यात. समुद्र किनाऱ्यावर भारतीयांनी तुकड्या तुकड्यात पाहिलेल्या या खेळाचे नंतरच्या काळात स्वतः भारतीयकरण केले. इंग्रजांच्या त्या खेळात आपला खेळ निर्माण करणारे हात होते ते पारसी समाजातील पोरांचे. त्यावेळची मुंबई आणि आजच्या मुंबईतील पारंपरिक पोषाक घालून क्रिकेटची बारखडी शिकणाऱ्या पारशी पोरांनी त्या काळात क्रिकेटचा पाया घातला, ज्यावर आज भारतीय संघ नावाची क्रिकेट जगातातील एक मोठी इमारत उभी राहिली आहे.

पारशी समाजाने भारतात क्रिकेटची अशी सुरुवात केली

मुंबईतील पारशी समाजाने भारतात क्रिकेटची अशी काय सुरुवात केली की, एका दीर्घ काळासाठी मग मुंबई हे क्रिकेटचं जग बनलं. भारताच्या लोकसंख्येत अगदी अल्प असूनही पारशी समाजाने क्रिकेटचा येथे गड उभा केला. भारतातील तो काळ होता असा होता की, भारतीय संघातील चार खेळाडू हे पारशी खेळाडू असायचे. आता मात्र क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये पारशी समाजाचे खेळाडू नगण्य आहेत. फारूख इंजीनियर हा पारशी समाजातील शेवटचा खेळाडू होता, जो 1975 मध्ये भारतीय संघात खेळला होता. त्यानंतर पारसी समाजातील एकाही खेळाडूने भारतीय संघात स्थान मिळवलं नाही. ज्यावेळी देशांतर्गत क्रिकेट संघांकडे बघितले जाते तेव्हाही त्यात अगदी एक दोनच नावं पारसी खेळाडूंची असतात. तर असं काय झालं की, देशाला क्रिकेटचे धडे देणारा पारशी समाज क्रिकेट जगातातूनच का आऊट झाला.

स्थलांतर आणि व्यापारामुळे सत्तेच्या जवळ

पारशी समाजाला कराव्या लागणाऱ्या स्थलांतरामुळे आणि व्यापारामुळे ते सत्तेच्या जवळ गेले. विस्थापित होऊन उजाड झालेल्या पारसी समाजाने भारतात हळू हळू आर्थिक सत्तेत आपला वाटा बनवाला. पिढ्यानपिढ्या चाललेल्या या सामाजिक प्रक्रियेत जेव्हा ब्रिटीश भारतात आले तेव्हा एक वेळ अशी आली की, मुंबई हे सत्तेचे एक नवीन केंद्र म्हणून उदयास आले. ए कॉर्नर ऑफ फॉरेन फिल्डमध्ये इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात, ज्या वेगाने मुंबई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास आली त्याच वेगाने पारशी समाज गुजरातमधून मुंबईत आला.

ब्रिटीश शासनाबरोबर मैत्रीच्या या प्रक्रियेत पारशी समाजाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, त्यानंतर भारतातील राजघराण्यातील सर्व राजपुत्रांनी क्रिकेट खेळ आवडीने खेळले. 1850 ते 1860 या काळात मुंबईत 30 पेक्षा जास्त क्रिकेट क्लब स्थापन झाले. त्यानंतर पारशी समाजातील सोराबजी शापूरजी यांनी घोषणा केली, की, पारसी क्रिकेट क्लबच्या होणाऱ्या सामन्यामधून जिंकणाऱ्या पारशी संघाला जाहीर इनाम मिळेल. म्हणूनच मग नशा चढल्यासारखी माणसं क्रिकेटकडे वळली. रामचंद्र गुहा म्हणतात कोवासाजी जहांगीर बार्ट यांनी रस्त गुफ्तार या वृत्तपत्रात जाहिरात दिली की, ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांना सगळ्यांना क्रिकेटचे कीट देण्यात येईल.

ब्रिटिश राजवटीत प्रसिद्ध बॉम्बे चतुर्भुज क्रिकेट सामने पारशी आणि युरोपियन यांच्यात सुरू झाले. खेळ वाढत गेला तसा पुढे 1906 मध्ये हिंदू आणि नंतर मुस्लिम संघाच्या प्रवेशानंतर हा सामना चौकोनी होत गेला.

पारशी संघाची मक्तेदारी मोडीत

हळूहळू हिंदू आणि मुस्लिम संघ जेव्हा खेळू लागले तेव्हा मात्र भारतीय क्रिकेटमधील पारशी संघाची मक्तेदारी मोडीत निघाली. हळूहळू परिस्थिती बदलून गेली, कारण भारतीय क्रिकेटमध्ये प्रातिनिधिक स्वरुपातील पारशी समाजातील एकाधिकारशाही हिंदू आणि मुस्लिम संघापुढे खेळताना दमछाक होऊ लागली. 1906 मध्ये युरोपीय टीमबरोबर हिंदू टीमबरोबर झालेल्या सामन्यात हिंदू संघाची चर्चा होते मात्र पारशी समाजाच्या क्रिकेटमधील योजनेबद्दल कुठेही चर्चा होत नाही. 1886 आणि 1888 मध्ये पारशी क्रिकेट संघाने ब्रिटनचा दौरा केला होता, आणि तिथे त्यांनी कित्येक सामने खेळले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे सामने पारशी टूर म्हणून ओळखले जातात.

युरोपीय खेळाडूंना टक्कर

त्यानंतर व्यावसायिक पारशी क्रिकेट, हिंदू आणि मुस्लिम संघांसोबत युरोपीय खेळाडूंना टक्कर देत होते. 1932 मध्ये जेव्हा भाारताने पहिली टेस्ट मॅच खेळवली त्यावेळी भारतीय संघामध्ये पारशी समाजाचे फिरोज आणि सोराबजी हे दोन खेळाडू होते. राजघराण्यातील पोरांनी भरलेल्या भारतीय संघातही दोन खेळांडूची निवड केली होती, त्यानंतरही हिंदू, मुस्लिम बहुसंख्य असूनही भारतीय संघात पारशी समाजाचे दोन खेळाडू होते, त्यानंतरही पारशी समाजातील खेळाडूंनी आपले स्थान अबाधित राखले.

पहिला प्रसिद्ध पारशी क्रिकेटपट्टू

1946 मध्ये रुसी मोदीने इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या सामन्यात रणजी ट्रॉफीमधील त्याच्या पदार्पणातच त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तो पहिला प्रसिद्ध पारशी क्रिकेटपट्टू बनला होता. रशियन खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये बॉम्बेकडून खेळताना सलग पाच शतके झळकावली. याशिवाय एका मोसमात 1000 धावा करणारा तो पहिला खेळाडू होता. पॉली उमरीगर हा ही 1948 मधील एक महान क्रिकेटर होता, तो अगदी 1962 पर्यंत भारतीय संघाचा सदस्य होता. उमरीगरने 59 टेस्ट खेळून 12 शतकं करुन त्याने 3631 धावा केल्या होत्या. पारशी समाजाने कोणत्याही हेतूने क्रिकेट चालू केले असले तरी उमरीगरने आठ सामन्यातून भारताचा कर्णधार राहिला होता. 1960 मध्येही पारशी समाजातील खेळाडूंचा खेळ इतका जबरदस्त होता की, भारतीय संघात चार ते पाच खेळाडू हे पारशी असत.

फारूख इंजीनियरः पारशी समाजातील प्रसिद्ध क्रिकेटर

1960-61 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पॉली उमरीगर आणि नारी कॉन्ट्रॅक्टर हे खेळाडू आधीच होते. मग रशियन सुरतींनीही त्यात स्थान मिळवले. या तीनही खेळाडूंनी पुढेही अनेक सामने भारतासाठी एकत्र खेळले. त्यानंतर फारुख इंजिनिअरचीही निवड झाली आणि भारतीय संघात चार पारशी खेळाडूंचा समावेश झाला. त्यानंतर मात्र सुर्तीला या संघातून वगळण्यात आले. मात्र तोपर्यंत फारुख इंजीनिअरने आपली जागा पक्की केली होती. फारूख इंजीनियर हा पारशी समाजातील सगळ्यात प्रसिद्ध क्रिकेटर होता. फटके लगावणारा क्रिकेटर आणि पहिला व्हिकेटकिपर होता. त्याच्या बल्लेबाजीची आठवण करुन देताना सांगतात की, त्याने नऊ षटकार ठोकले होते आणि 54 धावा काढल्या होत्या. 1975 पर्यंत फारूख भारतीय संघात असताना त्याच्यासोबत आणखी तीन जण पारशी समाजातील असायचे त्याच्यानंतर मात्र पारशी समाजातील एकही खेळाडू भारतीय संघात राहिला नाही.

पारशी समाज क्रिकेटपासून दूर का गेला या प्रश्नाचे उत्तर देताना रामचंद्र गुहा कारण सांगतात ते त्यांच्या लोकसंख्येचं. भारतात पारशी समाज आता आहे तो फक्त 80 हजार ते 1 लाखाच्या घरात त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसमुहापुढे पारशी समाज नगण्य ठरतो. कधी काळी क्रिकेटचा मुंबईत दबादबा होता आणि क्रिकेटमध्ये पारशी समाजाचा. ज्यावेळी 1983 चा विश्वकप भारताने जिंकला आणि मुंबईत असलेली क्रिकेटची मक्तेदारी मोडीत काढली आणि देशातील छोट्या छोट्या शहरातून क्रिकेट क्लब स्थापन झाले, आणि याचा परिणाम पारशी क्रिकेट क्लबवर होऊ लागला.

आता अशी परिस्थिती आहे की, पारसी क्लबच्या होणाऱ्या टूर्नामेंटमध्येही इतर संघाना प्रवेश दिला जातो कारण पारशी समाजाच्या संघाबरोबर खेळण्यासाठी दुसरा कोणताच संघ नसतो.

संबंधित बातम्या

IPL 2022 Auction: महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंवर कोलकात्याची नजर, महालिलावात पर्स रिकामी करण्यास तयार?

IPL 2022 Auction: बंगळुरुतल्या 2 दिवसांच्या महालिलावात 590 खेळाडूंची विक्री, धवन, वॉर्नर, श्रेयस, बोल्टवर सर्वांच्या नजरा

IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या