AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 note exchange : 2000 रुपयांच्या नोटा जमा करताना सावधान, इनकम टॅक्सच्या रडारवर येणार

2000 note exchange : कोणाच्याही 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचा खटाटोप करु नका, नाहीतर तुम्ही इनकम टॅक्सच्या रडारवर आल्याशिवाय राहणार नाहीत.

2000 note exchange : 2000 रुपयांच्या नोटा जमा करताना सावधान, इनकम टॅक्सच्या रडारवर येणार
| Updated on: May 24, 2023 | 7:55 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या 2000 रुपयांच्या नोटांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा घातली नाही. कर तज्ज्ञांच्या मते, नोटा जमा करताना नागरिकांना आर्थिक देवाण-घेवाणीसंबंधीचा (SFT) निर्णय माहिती असणे आवश्यक आहे. तर या SFT नियमानुसार, जास्त रोखीतील वा रक्कमा खात्यात जमा केली तर बँका याविषयीची माहिती आयकर खात्याला देतात. हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. रक्कम जमाकर्त्याला 26एएस आणि वार्षिक सूचना विवरणासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे कोणाच्याही 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचा खटाटोप करु नका, नाहीतर तुम्ही इनकम टॅक्सच्या (Income Tax) रडारवर आल्याशिवाय राहणार नाहीत.

काय सांगतो नियम एका आर्थिक वर्षात चालू खात्यात आणि इतर खात्यात ही मर्यादा 10 लाख रुपये आणि एका आर्थिक वर्षात एक अथवा इतर चालु खात्यासाठी ही मर्यादा 50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

ही काळजी अवश्य घ्या बँकेत नोटा जमा करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार खातेदाराने त्याचा खाते क्रमांक, नाव आणि इतर आवश्यक तपशील अद्ययावत ठेवावा. बँकेत रक्कम जमा केल्याची पावती पण सांभाळणे फायदेशीर ठरते. बँक काऊंटरवर अथवा ऑलनाईन व्यवहारात बँक स्टेटमेंट उपयोगात येते.

आयकर खात्याचा नियम आयकर खात्याच्या नियमानुसार, जर तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड क्रमांक देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे बँकेत मोठी रक्कम जमा करताना पॅनकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

तर इनकम टॅक्स नोटीस बँकेत पैसा जमा केल्यानंतर प्राप्तिकर खात्याची नोटीस मिळू शकते. तुम्हाला 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याची कोणतीच मर्यादा नाही. तुम्ही किती ही रक्कम जमा करु शकता. पण याचा दुसरा अर्थ असा पण आहे की, तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर येऊ शकता. एका दिवशी नागरिकाला दोन हजारांच्या 10 नोटा म्हणजे एकूण 20,000 रुपये जमा करता येतील. पण तुम्ही किती रक्कम जमा करत आहात, आयकर विभागाच्या मर्यादेपक्षा ही रक्कम जास्त असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचे स्त्रोत काय याची विचारणा होऊ शकते.

महत्वपूर्ण बदल RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे एका मर्यादेपर्यंत या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज अथवा ओळखपत्र दाखविण्याची गरज नाही.

रोख आणा आणि रोख न्या आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.