अवघ्या काही दिवसात करा पैसे दुप्पट, टपाल खात्याची केवीपी योजना

गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या देशात उपलब्ध आहेत. यात एलआयसी, बॅंकेत फिक्स डिपॉझिट, शेअर बाजार, रिअल इस्टेट असे अनेक पर्याय आहेत. असे अनेक पर्याय उपलब्ध असतांना सर्वात भरवशाचा पर्याय म्हणून टपाल खात्याच्या किसान विकास पत्र अर्थात केवीपी या योजनेकडे बघितले जाते. दामदुप्पट व सुरक्षित गुंतवणुकीमुळे अनेक जण या योजनेला पसंती देतात. 124 महिन्याच्या अवधीसाठी ही सुविधा उपलब्ध असते. विशेष म्हणजे, फक्त 30 महिन्याचा लॉकइन पीरियड यासाठी आहे. यामुळे 30 महिन्यानंतर खातेबंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

अवघ्या काही दिवसात करा पैसे दुप्पट, टपाल खात्याची केवीपी योजना
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 11:16 AM

मुंबई : टपाल खात्याकडून अनेक योजना राबवण्यात येतात. यायोजनांमध्ये पैसे जमा करून चांगला परतावा मिळण्यासाठी मिळत असल्याने गुतवणुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. टपाल खात्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक केल्याने पैसे आणि परताव्याची हमी मिळत असल्याने टपाल खात्याच्या योजना सुरक्षित मानल्या जातात. टपाल खात्याच्या काही योजनांमधून आयकरात सुट आणि पैसे दुप्पट करण्याची सोय असते. यामुळे अनेक गुंतवणूकदार टपाल खात्याच्या योजनेमध्ये सहभागी होण्यास पसंती देतात.

टपाल खात्याकडून अनेक लोकप्रिय योजना राबवण्यात येतात. यात मुदत योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. तसेच टपाल आवर्ती जमा खाते अर्थात आरडी आणि पीपीएफ या योजना देखील आहेत. यातील किसान विकास पत्र योजना आहे. यात गुंतवणूक केले पैसे दुप्पट करण्याची सोय आहे. किसान विकास पत्र या योजनेतून चांगला परतावा देण्यात येतो. यामुळे योजनांमध्ये गुंतवणूक करणार्यांची संख्या मोठी आहे. गुंतवणूक केल्यानंतर आयकरामध्ये देखील सवलत देण्यात येते. यामुळे गुंतवणुकीसोबतच कर बचतीसाठी देखील हा चांगला पर्याय आहे. देशातील प्रत्येक टपाल कार्यालयात किसान विकास पत्र काढण्याची सोय उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 6.9 टक्के व्याज देण्यात येते. योजनेत 1 हजार रुपयापासून गुंतवणूक करून शकता. अधिकतम कितीही गुंतवणूक या योजनेत करता येते.  जर तुम्ही 5 हजार रुपये गुंतवणूक केले तर 124 महिन्यानंतर तुम्हा 10 हजार रुपये मिळतील.

लॉकइन कालावधी कमी किसान विकास पत्र योजनेत 124 महिन्यात दाम दुप्पट पैसे मिळतात. मात्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर लॉकइनचा कालावधी कमी आहे. यामुळे अवघ्या 30 महिन्यात पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे 30 महिन्यानंतर पैसे काढून खाते बंद करता येउ शकते. काही कारणामुळे  पैशांची गरज असल्यास खाते बंद करून पैसे काढू शकता. खाते बंद करण्यासाठी फॉर्म 2 टपाल कार्यालयात भरून द्यावा लागेल. गुंतवणूक केल्यानंतर पैशाची गरज असल्यास योजनेचे प्रमाणपत्र कार्यालयात जमा करून पैसे काढता येउ शकतात.

जर तुम्ही 1 हजार रुपये किसान विकास पत्र तयार केले. मात्र तीन वर्षापूर्ण होण्यापूर्वीच तुम्ही पैसे काढले तर 1 हजार 154 रुपये मिळतील. जर पाच वर्षानतर खाते बंद केले तर 1हजार332 आणि  साडेसात वर्षानंतर मात्र आठ वर्षापूर्वी खाते बंद केले तर 1 हजार 37 रुपये मिळतील.तसेच दहा वर्षपूर्ण होण्यापूर्वीच खाते बंद केल्यास 1 हजार 774 रुपये देण्यात येतात. 124 महिन्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर पैसे दुप्पट होउन तुम्हाला 2 हजार रुपये मिळतीत.

संबंधित बातम्या :

गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न

डिजिटल करन्सीसाठी चालू वर्ष कसे राहणार?; जाणून घ्या क्रिप्टोमधील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञाचे मत

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.