AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Scheme : ही सरकारी योजना डबल करेल पैसा! करा अशी गुंतवणूक

Kisan Scheme : या सरकारी योजनेत तुमचा पैसा डबल होईल. या योजनेला सरकारकडून हमी मिळते. त्यामुळे पैसा बुडण्याची भीती नसते. तसेच व्याजदर चांगला असल्याने परतावा पण चांगला मिळाला.

Kisan Scheme : ही सरकारी योजना डबल करेल पैसा! करा अशी गुंतवणूक
| Updated on: Jun 24, 2023 | 7:15 PM
Share

नवी दिल्ली : टपाल खात्यातील अल्पबचत योजना (Post Office Small Savings Scheme) लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यामुळे नागरिकांना बचतीची सवय लागली आहे. पोस्ट खात्यातील अल्पबचत योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सुरक्षित परताव्यासाठी (Return) टपाल खात्याच्या योजनेत गुंतवणूक फायद्याची ठरेल. टपाल खात्यातंर्गत मुदत ठेव योजना, मासिक बचत, जेष्ट नागरिक बचत, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला फायदा होईल. या योजनेत पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र (Kisan Vikas patra) योजनेत जोरदार परतावा मिळतो.

सरकारची हमी देशात पोस्ट ऑफिसचे जाळे मजबूत आहे. किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी टपाल कार्यालयात खाते उघडावे लागेल. पोस्ट खात्यातील योजनांमध्ये पैसा बुडण्याची भीती नसते. या योजनांना केंद्र सरकारचे संरक्षण आहे. सरकार या योजनेची हमी घेते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत वार्षिक 7.5 टक्के व्याजदर आहे. या योजनेत तुम्ही 115 महिन्यात गुंतवणूक दुप्पट करु शकता.

1000 रुपयांपासून गुंतवणूक किसान विकास पत्र योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करु शकते. या योजनेत 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

कोणाला उघडते येते खाते या योजनेत एक आणि तीन प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत अल्पवयीन अथवा भोळसर व्यक्तीच्या नावेही पालकाला खाते उघडता येते. या योजनेत खाते हस्तांतर करण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अथवा सह खातेदाराच्या नावे खाते हस्तांतरीत करता येते.

योजनेचा कालावधी या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

मॅच्युरिटीपूर्वी करता येते खाते बंद किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद करता येते. त्यासाठी काही अटी घालण्यात येतात. एकच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद करता येते.

अशी करा गुंतवणूक

  • टपाल खात्याच्या किसान विकास पत्र (KVP) अर्ज, फॉर्म-ए प्राप्त करा
  • आवश्यक माहिती, तपशील भरुन हा अर्ज जमा करा
  • एजंटच्या मदतीने फॉर्म भरता येईल
  • केवायएसी प्रक्रियेसाठी आवश्यक दस्तावेजांची एक कॉपी तयार ठेवा
  • पडताळणी आणि रक्कम जमा केल्यानंतर केव्हीपी प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येते

फायदे काय

  • गरजेच्या वेळी तुम्हाला पैशांची गरज असते, त्यावेळी या योजनेतून तुम्हाला पैसे काढता येतात
  • किसान विकास पत्र बँकेत तारण ठेऊन कर्ज घेता येते
  • या गुंतवणुकीवर आता आयकर सवलत मिळत नाही
  • उत्पन्नानुसार तुम्हाला कर भरावा लागू शकतो

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.