काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण तालिबानने केल्याचं वृत्त समोर येत आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारत सरकारने याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टरजवळूनच या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिली आहे. तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला.