महाडच्या तळीये गावात काल संध्याकाळी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू झाला असून दरडीखाली 80 ते 85 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना काल घडूनही आज दुपारपर्यंत मदत मिळाली नव्हती. आता तळीये दुर्घटने प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. काल सायंकाळी 4 वाजता ही दुर्घटना घडली होती. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडी खाली 35 घरे दबली गेली.