संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणे भरून वाहात आहेत. औरंगाबादमधील शिवना टाकळी धरणाचे 4 दरवाजे उघडले आज उघडण्यात आले आहेत. तसेच अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पिशोर येथील रामेश्वर वस्तीवर जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नदीवर एक दोरखंड बांधण्यात आला आहे. त्या दोर खंडास पकडून शेतकऱ्यांना ये-जा करावी लागत आहे. आज सकाळी दोरखंड पकडलेले असताना एक जण वाहून जात होता. मात्र आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला वाचवले. त्याामुळे मोठी दुर्घटना टळली.