शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे पक्ष आणि सरकार हे दोन्हीही संकटात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात प्रचंड घडामोडी घडत आहेत. आमदारांच्या या भूमिकेमुळे राज्याचेही नुकसान होत आहे .याबद्दलची अधिक माहिती रश्मी ठाकरे ह्या बंडखोर आमदारांच्या पत्नीला देत असून त्यांनी हे बंड थंड करण्याबाबत राजी करावे अशा प्रकारचा संवाद त्या फोनवरुन करीत आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून बंडखोर आमदारांना मुंबईत परत या असे आवाहन केले. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्या मागण्यावर ठाम आहे. ऐत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील राज्यकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.