राज्यात गेल्या काही तासांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोयं. मराठवाड्यासह, अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक, गडचिरोली आणि नागपूर जिल्हात पावसामुळे पूर स्थिती निर्माण झालीयं. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. तसेच कोल्हापूरमध्येही नद्यांना पूर आला असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर शहरात पावसाच्या पाण्यामुळे अनेक रस्ते आणि महामार्ग देखील बंद पडले आहेत.