मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये रात्री मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्त्यं भिडल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणलीयं. मात्र, आता परत एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे. इतकेच नाही तर या वादामध्ये आता राज्यातील मोठ्या नेत्यांनीही उडी घेतल्याचे दिसून येत आहे.