रात्री तीन वाजता फोनवरून धमकी देतात आणि…, वसंत मोरे यांचा गौप्यस्फोट

रात्री तीन वाजता फोनवरून धमकी देतात आणि…, वसंत मोरे यांचा गौप्यस्फोट

Harshada Shinkar | Updated on: Mar 13, 2024 | 2:16 PM

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या दिवशीही भावनिक आणि अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळाले. आज बोलताना त्यांनी काही गौप्यस्फोटही केलेत. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कुणीही यावर भाष्य करायचे नाही, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. यावर काय म्हणाले मोरे?

पुणे, १३ मार्च २०२४ : मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या दिवशीही भावनिक आणि अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळाले. आज बोलताना त्यांनी काही गौप्यस्फोटही केलेत. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कुणीही यावर भाष्य करायचे नाही, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. यावर वसंत मोरे यांना विचारले असता वसंत मोरे म्हणाले, कुणीही थांबले नाही, पक्षातील लोकं रात्री तीन, तीन वाजता कार्यकर्ते, शाखाध्यक्षांना फोन करुन धमकवत आहेत. पोस्ट डिलिट कर, असे सांगत आहे. पोस्ट का टाकली, त्याचा जाब विचारत आहे. हे प्रकार थांबले नाही तर मला राज साहेबांना सांगावे लागेल. साहेबांना कोण फसवत होते, ती नावे जाहीर करावी लागतील, असा इशाराही त्यांना कार्यकारणीतील त्या लोकांना दिला.

Published on: Mar 13, 2024 2:16 PM
Follow Us