सरकार किती दिवस चालते काय माहिती…
विरोधकांवर सडकून टीका करत सांगितले की, आता तुम्हाला विरोधी गटात बसायचे आहे, त्याची सवय करुन घ्या असा टोमणाही त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रावादीच्या नेत्यांना लगावला.
शिंदे-फडणवीस सरकार येऊन पंधरा दिवस झाले तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पंधरा दिवस होण्याआधीच माईकची ओढाओढी चालू झाली आहे, त्यामुळे हे सरकार किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चिठ्ठीवरूनही त्यांनी टोलेबाजी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी माझ्या मुख्यमंत्र्याला चिठ्ठी दिली तर बिघडले कुठे असा पलटवारही फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत सांगितले की, आता तुम्हाला विरोधी गटात बसायचे आहे, त्याची सवय करुन घ्या असा टोमणाही त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रावादीच्या नेत्यांना लगावला.
Published on: Jul 15, 2022 8:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
