राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या थेट आणि बिनधास्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या खास शैलीत ते आपलं म्हणणं मांडत असतात. मीडियाने आपल्या म्हणण्याचा ध चा मा करू नये म्हणूनही ते प्रयत्न करत असतात. आज तर त्यांनी आपल्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणांची आठवण काढली. त्यांच्या लग्नाचा किस्साच अजितदादांनी सांगितलं. निमित्त होतं दसऱ्याचं. माळेगाव साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ आजपासून सुरू झाला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला.