MNS Avinash Jadhav :ठाकरेंचा उमेदवार शिंदेंच्या घरी अन् त्याची निवडणुकीत माघार! अविनाश जाधवांनी थेट VIDEO चं लावला

Harshada Shinkar | Updated on: Jan 05, 2026 | 11:03 AM

कल्याण डोंबिवलीसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत बिनविरोध निवडीवरून सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप झाले आहेत. मनसे आणि ठाकरे गटाने विरोधी उमेदवारांवर दबाव, पैशाचे आमिष आणि पोलिसांच्या मदतीने अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा दावा केला. अविनाश जाधव यांनी एका व्हिडिओच्या आधारे ठाकरेंच्या उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेल्याचा आरोप केला, ज्यानंतर उमेदवाराने माघार घेतली.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडीवरून राजकारण तापले आहे. कल्याण डोंबिवलीसह विविध ठिकाणी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत की त्यांनी पैसे, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांच्या मदतीने विरोधी उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ सादर करत असा दावा केला की, ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एका पोलीस अधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेले आणि त्यानंतर घाग यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधव यांनी या घटनेची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

या आरोपांना उत्तर देताना, विक्रांत घाग यांनी स्पष्ट केले की, ते स्वेच्छेने शिंदे साहेबांना भेटायला गेले होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्या मतानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण १२२ जागांपैकी भाजप आणि शिंदे गटाचे २० नगरसेवक निकालापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे सत्तेसाठी त्यांना आता फक्त ४२ जागांची आवश्यकता आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, अर्ज मागे घेणारे अनेक उमेदवार ठाणे सोडून पळून गेले आहेत.

Published on: Jan 05, 2026 11:03 AM
Follow Us