अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही राज्य जवळपासच आहेत. त्यामुळे मला वाटलं की, आसाममधीलच लोकं कुत्रे खातात. त्यामुळे ते चुकून नागालँड ऐवजी आसाम असं मी बोलून गेलो.नागालँड बोलायला पाहिजे होतं. एवढीच त्यात माझी चूक आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.