Anjali Damania | महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना विचारला धारदार प्रश्न
लोकसभेत महिला आरक्षण बिल नामंजूर झाले, गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. त्यानंतर भाजपने देशभरात काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका करणे सुरू केले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर टीका केली आहे. नेमका हाच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर अचूक निशाणा साधला आहे.
लोकसभेत महिला आरक्षण बिल नामंजूर झाले, गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. त्यानंतर भाजपने देशभरात काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका करणे सुरू केले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर टीका केली आहे. नेमका हाच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर अचूक निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया यांनी ट्वीट केले की, “विरोधी पक्ष बँड वाजवून डान्स करावा. हे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या भाजप ने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये, फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह! महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री का आहेत?” या ट्वीटमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Published on: Apr 19, 2026 04:06 PM
Follow Us
