Anna Hajare : अण्णा हजारेंचा पहिल्यांदाच केजरीवालांवर हल्लाबोल..! काय आहे कारण?

| Updated on: Aug 30, 2022 | 10:40 PM

दिल्ली सरकारने दारुबाबत घेतलेले धोरण म्हणजे तरुणांना दारु पिण्यासाठी एकप्रकारे आमंत्रित केल्या सारखेच आहे. दारु पिण्यासाठी याआगोदर 25 वयोवर्षाची अट होती ती आता केवळ 21 वर आणली गेली आहे. अरविंद केजरीवाल यांचे हेच धोरण अण्णा हजारे यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहलेले आहे. शिवाय वेळ पडली तर आपण त्यांना याबद्दल बोलणार ही असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Follow us on

अहमदनगर :  (Anna Hajare) अण्णा हजारे यांना आपले गुरु मानणारे (Arvind Kejariwal) अरविंद केजरीवाल हे आता (Delhi CM) दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्याबद्दल बोलणे हे टाळलेलेच आहे. पण आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दारु विक्रीबाबत घेतलेले धोरण हे अण्णा हजारे यांना पटलेले नाही. दिल्ली सरकारने दारुबाबत घेतलेले धोरण म्हणजे तरुणांना दारु पिण्यासाठी एकप्रकारे आमंत्रित केल्या सारखेच आहे. दारु पिण्यासाठी याआगोदर 25 वयोवर्षाची अट होती ती आता केवळ 21 वर आणली गेली आहे. अरविंद केजरीवाल यांचे हेच धोरण अण्णा हजारे यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहलेले आहे. शिवाय वेळ पडली तर आपण त्यांना याबद्दल बोलणार ही असल्याचे त्यांनी सांगितले आहे.