महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत स्मृती इराणींनी केले विद्यार्थांचे स्वागत केले

| Updated on: Mar 02, 2022 | 12:33 PM

युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी  संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले. 

Follow us on

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध (War) सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. अशा परिस्थितीत युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी  संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले.