कोरोना(Corona)च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करणं अशक्य आहे. आरोग्य सुविधा वाढवल्या, असं म्हणणारे खोटारडे आहेत, अशी टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केलीय. आजही ग्रामीण रुग्णालयात कोणतीही सुविधा नाही. न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं. मात्र सुविधा अद्याप नाहीत. या राज्य सरकारला जाग येत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.