‘सुरत लुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले होते, हे काय सांगतात भाजपवाले..,’ काय म्हणाले जयंत पाटील

‘सुरत लुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले होते, हे काय सांगतात भाजपवाले..,’ काय म्हणाले जयंत पाटील

| Updated on: Sep 07, 2024 | 5:24 PM

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती असा नवा दावा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरत लुटली नव्हती असा दावा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर जयंत पाटील यांनी भाजपाला इतिहास माहिती नाही अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी कृष्णाजी अर्जून केळुस्कर यांनी लिहीलेला इतिहासाचा दाखला जयंत पाटील यांनी दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लुटली तेव्हा तेथील व्यापाऱ्यांना पत्र लिहीले होते. तुम्ही प्रती वर्षी 12 लाख खंडणी बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहीले आहे. हे काय सांगतात भारतीय जनता पार्टीवाले. खंड हा आहे तो आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही आम्हाला तुमच्या उत्पन्नातील खंड द्या अशी पद्धत त्यावेळी होती. खंड मागणे आताचे गुंड टोळ्या खंडणी मागतात ते नव्हे त्याकाळात आपले सामर्थ्या दाखवून समोरच्या कडून खंड मागितला जात असे अशी व्यवस्था पू्रीव होती असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Published on: Sep 07, 2024 5:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us