औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहराच्या नामांतरावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर कधी करणार असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तर आधी औरंगाबादच्या विमानतळाचे नाव बदला. आम्ही तसा प्रस्ताव देखील केंद्राकडे पाठवल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.